शब्द हे मायाजाळ
शब्द सुचतात पण कधी यमक जुळत नाही पण जेव्हा शब्द जन्म घेतात तेव्हा यमक जुळतात तसेच आयुष्यच आहे प्रेम जमलं तर यमक नाही जुळत
गुरुवार, १६ जुलै, २०२०
प्रिय शिरीन....
बुधवार, १५ जुलै, २०२०
तु आलास की...
सोमवार, ६ जुलै, २०२०
अर्धवट....
शनिवार, ४ जुलै, २०२०
स्वप्न नगरीचा राजा
बुधवार, ३ जून, २०२०
बुधवार, २७ मे, २०२०
कोरोना एक अविशाप
मी एक सामान्य समाज सेवक आणि आमची आई अंगणवाडी मध्ये मागील २५ वर्ष झाले सेविका म्हणून कार्यरत आहे त्यादिवशी केंद्र सरकार कडून आलेले धान्य वाटप करण्यासाठी मी आणि आई अंगणवाडी मध्ये गेलो २३ एप्रिल रोजी सदर महिला आमच्या संपर्कात आली आणि २५ एप्रिल रोजी सदर महिला कॉविड १९ पॉझिटिव्ह आली
त्यामुळे २६ तारखेला मला आणि माझ्या परिवाराला ऐरोली येथील महानगरपालिका इस्पितळात चाचणी करण्यासाठी सकाळी ९ च्या सुमारास नेण्यात आले सोबत एकूण २७ संशयित आणि ७ लहानमुले असे सर्व शेजारील लोक होते ऐरोली च्या इस्पितळात नेताना सर्व लोक सर्कस मधील जनावरांना नेताना जसा आनंद घेत होते आणि मोबाईल काढून व्हिडीओ काढत होते माझ्या जीवाला चटका लागला आपण समाजासाठी एवढे जीवापाड मदत करतो पण त्याच्या मोबदल्यात अशी परत फेड मिळते असो. त्यानंतर आमच्या सर्वांच्या चाचण्या घेत ४ वाजले तिथे ना पाण्याची सोय नाही जेवणाची सोय सर्व लहान मुले भुकेने कळवळत होती तिथल्या काही अधिकाऱ्यांनी कळवलं की विलगीकरण कक्षात पोचल्यावर तुम्हाला जेवण देण्यात येईल त्यानंतर १४ वर्षाच्या लहान मुलांच्या सोबत एक पालक वाशी येथील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आणि बाकीचे २० सांशीयीत पनवेल येथील इंडिया बुल्स विलगीकरण कक्षात एकाच अँबुलन्स ने नेण्यात आले सदर अँमबुलन्स ची क्षमता ४ संशयित नेण्याची असताना त्यात वडाप भरल्या सारखे भरगच्च २० व्यक्ती कोंबण्यात आले सायंकाळी ५ च्या सुमारास पनवेल येथील विलगीकरण कक्षात पोहचविण्यात आले सकाळ पासून सर्व संशयित उपाशी काहीही न खाता आणि पिता या आशेत होते की लवकरच काहीतरी खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी पाणी मिळेल काही तासांनी मी तेथील कर्मचाऱ्यांना विचारपोस केली असता लवकरच काहीतरी देण्यात येईल अशी आशा दाखविण्यात आली परंतु रात्रीचे ९ वाजले परंतु पाणी सुद्धा मिळाले नाही जसे कारागृहात कैद्यांना बसवले जाते तसेच काही आमच्या सोबत देखील घडले इमारतीच्या एका कोपऱ्यात सर्व संशयित बसून होते ४ तासानंतर एका कर्मचाऱ्यांची नजर पडली त्याने आश्वासन दिले की लवकरच तुम्हाला खोली आणि जेवणाची सोय केली जाईल अशी आशा दाखवली रात्रीचे १० वाजले ५ तासानंतर सुद्धा पाणी नाही जेवण नाही भुकेने पोटात गोळा येत होता सदर वागणुकीने त्रस्त होऊन मी पुन्हा त्या कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांचे उत्तर माझ्या कानातून रक्त येण्यासारखं होत "इतक्या लवकर काही मिळणार नाही तुम्ही काही आमदार खासदार नाही किंव्हा आमचे कुणी नातेवाईक नाहीत की तुम्हाला इथे पाहुणचार मिळेल आणि असच १४ दिवस कुत्र्यासारखा राहण्याची तयारी ठेवा" आणि "तुम्हाला कुत्र देखील विचारणार नाही अशी उत्तर मिळत होती" तेव्हा आमच्या सर्वांच्या आशा एकाच व्यक्तीकडे होत्या तो म्हणजे तेथील पोलीस निरीक्षक माझे वडील पोलीस बांधवाकडे मदत मागण्यांसाठी त्याच्याकडे गेले असता त्याने वडिलांना शिवीगाळ करत म्हणाला "म्हाताऱ्या तिकडे लादिवर झोप नाहीतर एक खानाखाली देईन" असे उत्तर जेव्हा माझ्या कानी पडले तेव्हा माझा पारा चढला काय करू काय नको असे झाले होते आपण ज्यांना आपले रक्षक म्हणतो तेच आपले भक्षक असतात हे त्यावेळेस मला कळलं आपण त्यांना आपले मित्र म्हणतो आपले रक्षक म्हणतो परंतु दुर्दैवाने ते त्यातले नाहीत हे त्यादिवशी स्पष्ट झाले आणि मी ट्विट करण्याचा निर्णय घेतला रात्री १०:१५ च्या सुमारास मी ट्विट केलं की
""'' मागील १३ तासापासून आम्ही उपाशी आहोत आम्हाला नाही पाणी मिळाले आहे आणि नाही जेवण खोली मिळण्याची सुद्धा आशा नाही आहे माझे आई वडील वयस्क आहेत त्यांची दुरवस्था होत आहे आई एक स्त्री असल्याने त्यांना होणारा त्रास काही सहन होत नाही"""" जमल्यास आपली मदत मिळावी सदर ट्विट करताच ट्विटर वरील #मायमराठी कुटुंबातील सर्व सदस्य ट्विट चा पाठपुरावा करत मदतीचा हात मागत होते त्या एका ट्विट ला खुप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि सर्व जनतेकडून आणि राजकारणातील नेत्यांच्या कडून मदतीचे हात हाथ पुढे येऊ लागले
तिथे एकूण दहा इमारती होत्या प्रत्येक इमारत २९ मजली प्रत्येक मजल्यावर एकूण ३० खोल्या होत्या अश्या एकूण दहा इमारती होत्या त्यापैकी तीन इमारती मध्ये आधीच काही संशयित ठेवण्यात आले होते आणि दहा पैकी दोन इमारती पॉझिटिव्ह रुग्णांकरिता ठेवण्यात आल्या होत्या.
त्या नंतर मध्यरात्री ११:४० च्या सुमारास खोली मिळाली प्रत्येकाला स्वतंत्र खोली देण्यात आली परंतु अजूनही पाणी आणि भुकेने व्याकुळ झालेले पोट काही ऐकत नव्हते तेव्हा माझे बोलणे नुकतेच नवी मुंबई कमिशनर सोबत झाले होते की लवकेच जेवण मिळेल कारण माझ्या ट्विटला सर्वानी पाठिंबा दिल्या नंतर १२.१५ च्या सुमारास जेवण मिळाले पण पाणी पिण्यासाठी वापरलेल्या मोकळ्या बाटल्या दिल्या आणि सांगितले एक पाणी पिण्याची मशीन आहे त्यातून सर्वानी पाणी भरावे एका मजल्यावर ३० खोल्या आणि एक पाणी भरण्याचे मशीन अश्याने सामाजिक अंतर कसे पाळावे हा मोठा मुद्दा होता त्यानंतर सर्वानी ट्विटला दिलेल्या प्रतिसादाने रात्र भर राजकारणी लोकांचे फोन सुरू झाले ""मी मदत करतो - मी मदत करतो"" माझे आभार व्यक्त कर माझे नाव ट्विट कर असे अनेक फोन आले राष्ट्रवादी, काँग्रेस , मनसे कार्यकर्त्यांनी फोनचा रात्रभर पाऊस पाडला. त्यानंतर पहाटे ३ च्या सुमारास नवी मुंबई पोलीस कंट्रोल रूम मधून फोन आला की तुम्ही दिल्ली ला तक्रार केली आहे परंतु वास्तविक मी कुठेही तक्रार नोंदवली नाही मी केलेल्या ट्विट मध्ये जनतेने इतक्या प्रमाणात सर्व राजकीय शासकीय त्यानंतर बातमीदार सर्वांना गुंतवले होते की सर्वांनी मला फोन केले आणि पोलीस मला जाब विचारत होते ते मदतीच्या हेतूने बोलत होते की दमदाटीच्या हेतूने बोलत होते हे काही कळेना दिवस भर उपाशी पोटाने त्रास दिला होता आणि आलेला थकवा काही थांबत नव्हता त्यानंतर पोलिसांनी पहाटे ४-५ च्या सुमारास पोलिसांची एक तुकडी पाठवली माझ्या मदती करीता आणि मला खाली बोलवण्यात आले त्यांनी विचारपोस केली तक्रार करण्याचे कारण काय आम्ही इथे आहोत वर पर्यंत तक्रार का केली असा जाब विचारत होते परंतु जेव्हा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना मदतीचा हात मागितला तेव्हा ते केकसत होते आणि नंतर आलेले पोलीस कर्मचारी आम्ही आहोत ना वर पर्यंत तक्रार का केली हा जाब विचारत होते नक्की सामान्य माणसाने करायचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्यानंतर काही त्रास असल्यास आम्हाला मदत माग वर पर्यंत तक्रार जाता कामा नये असे ठासून सांगितले. सकाळी आणखी काही वरिष्ठ मंत्र्यांच्या ऑफिसातून फोन आले आम्ही मदत करू असे आश्वासन देण्यात आले परंतु खोली मध्ये अत्यावश्यक वस्तूंची सोय नव्हती(उदा; पाण्याची बदली, झोपण्यासाठी बेड, उशी, पिण्यासाठी पाणी, जेवणासाठी थाळ्या, इ.)त्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागला त्यानंतर पहिला दिवस उजाडला सकाळचे १० वाजून गेले नाष्टा आणि चहा सुद्धा आला नाही आदल्या दिवशी उपाशी पोटाने हाल केले आणि आजची परिस्थिती सुद्धा सारखीच असेल का या भीतीने लोक खोलीत बसून होते. दुपारी १२.१० च्या सुमारास कंत्राटी कामगार चहा देण्यासाठी आला परंतु चहा घेण्यासाठी ग्लास घरून घेऊन यायचे असते असे तेव्हा कळले त्या नंतर दुपारी जेवणाची वाट बघत सायंकाळ उजाडली सायंकाळी ४.४५ च्या सुमारास जेवण आले त्यावेळी कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता तुम्ही आला आहात याची त्यांना कल्पना नव्हती त्यामुळे जेवण दिले नाही अशी बाब समजली आणि तोही दिवस निघून गेला तो वनवसातील पहिला दिवस होता त्यानंतर जे काही लोक माझ्या संपर्कात आले होते ते
स्वार्थी लोक सतत फोन करत होते त्यांना माझ्या प्रकृती बद्दल चिंता नव्हती तर काही व्यक्तींच्या संपर्कात मी आलो असल्यानं त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती परंतु चाचणीचे अहवाल कधी मिळतील याची कल्पना कुणालाही नव्हती तिसऱ्या दिवशी अत्यावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले तोवर ओंजळीने अंघोळ करण्याचा लाभ घेतला आणि लादिवर झोवण्याचा अनुभव असल्यामुळे ते काही जड गेले नाही चौथ्यादिवशी अहवाल येतील अशी आशा देण्यात आली होती परंतु अहवाल काही आले नाही परंतु पाचव्या दिवशी आमच्या सोबत आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे सर्वांच्या मनात भीतीने घर केलं कारण चाचणी घेतल्यानंतर आम्ही सर्व २० संशयित एकत्र एकाच गाडीने आलो होतो त्यामुळे नवी मुंबई चे नोडल ऑफिसर आणि कमिशनर यांना ई मेल द्वारे पत्र दिले की आमच्या सर्वांची दुसरी चाचणी त्वरित घेण्यात यावी परंतु त्यावर विचार करावा लागेल असे उत्तर त्यांच्या कडून मिळाले त्यामुळे अस्वस्थता वाढली त्या नंतर त्याच रात्री आईची प्रकृती खालावली आणि माझ्या मनात भीतीने घर केलं मी कावरा बावरा झालो होतो जेव्हा वेळ आपल्यावर येत तेव्हा खर दुःख कळत ही खोटी गोष्ट नाही त्यानंतर मी थेतील डॉक्टर यांची मदत मागितली असता त्यांनी मला ऑनलाईन तक्रार करा अशी माहिती मिळाली त्यानंतर मी ऑनलाईन वेबसाईटवर नवी मुंबई मुख्य कार्यालयातील संपर्क शोधला आणि त्वरित त्यांना फोन केला रात्री १२ ते १ च्या सुमारास डॉ. उज्वला ओतुर्कर या कार्यरत होत्या मी आजही त्यांच्या कार्याला सलाम करतो एक स्त्री असूनही त्या रात्री रुग्णांच्या सेवे करीता रुजू होत्या यांनी त्वरित इंडिया बुल्स पनवेल येथील डॉक्टरांना फोन करून साहाय्य करण्याचे आदेश दिले आणि मला त्वरित मदत मिळाली त्यांचे आभार मी आयुष्यात कधी विसरणार नाही आणि त्यांनी आश्वासन दिले की आणखी काही मदत लागल्यास नक्की कळवा अशी विनंती केली
२ तारखेला आलेल्या अहवालात सदर व्यक्ती पॉझिटिव्ह आला त्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले नव्हते किंवा इतर काही औषध उपचार सुद्धा सुरु करण्यात आले नव्हते त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्ती मानसिक दबावाखाली आला होता त्याला ५ वर्षाची लहान मुलगी त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर जबाबदार कोण असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला असता त्यावर असे उत्तर मिळाले की आम्ही मोजकेच अधिकारी कुठे कुठे पाहणी करणार परंतु सतत पाठपुरावा घेत असल्यामुळे अखेर ६ दिवसानी त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह आरक्षित इमारती मध्ये हलविण्यात आले परंतु १४ दिवस उलटून गेले तरीही दुसरी चाचणी घेण्यात आली नाही तेव्हा मी तेथील अधिकारी आणि डॉक्टर यांना जाब विचारला असता टोलवा टोलवीची उत्तर मिळाली परंतु सोबतच असे काही व्यक्ती आले की जे तिथे २८ दिवसा पासून विनवणी करत होते की केव्हा त्यांना सोडण्यात येईल बाकी सर्व बेलापुर, नेरुळ, घणसोली, तळवली, ऐरोली दिवा गाव येथील संशयित असून काहींना १४-१८-२२-२८ दिवसापासून तेथेच अडकून होते परंतु जेव्हा जेव्हा ते जाब विचारायला जात असत त्यांना हुरकवून लावण्यात येत होते परंतु ९ तारखेला सर्वांचा प्रतिक्षेचा बांध तुटला आणि १०० ते २०० व्यक्ती खाली उतरले आणि त्या जमावाने अधिकाऱ्यांना धारेवर धरले आमच्या पैकी अर्धे इमारतीच्या खिडकीतून तमाशा बघत तसेच होते मी त्वरित नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना फोन करून सूचना दिली त्यानंतर पोलीस आयुक्त तेथे आले येताना त्यांनी स्वतःचा फौज फाटा घेऊनच आले जसे की आम्ही त्यांच्यावर हल्ला करणार आहोत परंतु मी आणि माझ्या सोबतच एक युवक होता आम्ही दोघांनी त्याच्या सोबत चर्चा केली त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली तेव्हा त्यांनी आश्वासन दिले की आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत घरी सोडण्यात येईल तेव्हा सर्वानी सुटकेचा श्वास घेतला आणि आप आपल्या खोलीत निघून गेले परंतु दिलेल्या आश्वासन नक्की खरे आहे का यावर मनात शंका निर्माण झाली परंतु संध्याकाळी अचानक ७ च्या सुमारास लोकांची झुंबड उडाली घरी जाण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या घरी जाण्यासाठी आतुर होता आणि गाड्यांची व्यवस्था कमी असल्याने काही लोकांना दुसऱ्या दिवशी सोडण्याचा निर्णय घेतला ८ च्या सुमारास काही इमारतीच्या दरवाज्याला टाळा लावण्यात आला कारण खुप मोठ्या प्रमाणात लोक घरी जाण्यासाठी निघाले होते आणि तिथे सोशल डिस्टन्स चे पार बारा वाजवले होते लोकांनी तरीही आम्ही विचार केला की एवढ्या गर्दी मध्ये घरी जाण्यापेक्षा एवढे दिवस थांबलो तर आणखी एक दिवस थांबुयात परंतु तेवढ्यात एक व्यक्ती माझ्या मजल्यावर सांगण्यास आला की ज्यादा गाड्या सोडत आहे जर तुम्हाला घरी जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही खाली जाऊ शकता तेच रात्री ११ च्या सुमारास खाली गेलो असता तेव्हा चित्र वेगळंच पाहायला मिळालं २० ते २५ डॉक्टरांची फौज तैनात होती मागील १४ दिवसात एकही डॉक्टर नजरेने दिसला नव्हता रुग्णांची चाचणी सुद्धा कंत्राटी असलेले कामगार घेत होते आणि आज निघायच्या वेळी एवढी फौज दिसणे आश्चर्यच होते आणि काही अक्कल शून्य माणस पालिकेने दिलेल्या अत्यावश्यक वस्तू म्हणजेच बादल्या,चादर,जेवणाची ताटे घरी घेऊन चालली होती तेव्हा माझा पारा चढला आणि त्यांच्या सोबत वाद सुद्धा झाला की प्रशासन तुमच्या सोई साठी वस्तू देत आहे घरी नेण्यासाठी नाही काही सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी वस्तू तिथेच ठेवून दिल्या पण त्याआधी बऱ्याच लोकांनी वस्तू पळवल्या सुद्धा आपणच जर आपल्या प्रशासनाला लुबाडले तर नक्कीच तोटा आपलाच आहे हे लोकांना कधी कळून चुकेल देव जाणे
मागील १४ दिवस नक्कीच वनवासात काढले काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या त्यामुळे काही गोष्टी कथे मध्ये नमूद केल्या नाही आहेत
जर प्रत्येकाला आपली जबाबदारी कळली तर नक्कीच असे दिवस कुणाच्या वाट्याला येणार नाहीत आणि शत्रूच्या वाट्याला सुद्धा असे दिवस येऊ नये अशी प्रार्थना करेन पण खर सांगायचं झालं तर एका विषाणूने माणसातला खरा स्वार्थी माणूस दाखवून दिला प्रत्येक जण स्वार्थी असतो हे कळवून दिले कोण आपलं जिवलग नाही सगळे स्वार्थासाठी जन्माला आले आहेत मित्र नाही आणि मैत्रीण सुद्धा नाही एकटे आलो एकटेच जाणार आहोत हे नक्की आहे
एका मायक्रो कोरोना विषाणूमुळे माणसातल्या खऱ्या स्वार्थी जाती दाखवल्या
कोण आपले आहेत कोण परके हे कळवून देण्यासाठी कोरोना जन्माला आला असावा त्याने जेवढं नुकसान केलं त्या पेक्षा जास्त अनुभव दिला कदाचित पुढे यापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण होणार असावी त्यामुळे ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी आताच घात केला म्हणजे यापुढे प्रत्येकाने माणसे जोडा पण त्याच्या आधी त्यांची परीक्षा घ्या त्यानंतरच जवळ करा कदाचित आजवर तुम्ही खुप माणसं जोडली असतील पण तुम्हाला कोरोना झाल्यावर ते तुम्हाला काळजी घे अशी मनस्थिती देण्यापेक्षा तू माझ्या संपर्कात का आला? हा प्रश्न विचारतील कारण त्यांना केलेल्या मदतीची किंवा त्यांच्या मैत्रीची जाणीव नसावी अशी माणसं आज उपयोगी नाही आली तर आयुष्याच्या शेवटी कशी उपयोगी येणार पण मी एवढे मित्र मिळाळवले ज्यांनी मला आजवर पाहिलं सुद्धा नसावं त्यांनी फोन करून एवढ्या मानसिकते मध्ये उभं केलं की आम्ही आहोत आपण जगाला हरवू शकतो हा तर इवलासा कोरोना आहे अश्या परिस्थिती मध्ये आर्थिक नाही तर मानसिक धीर देणारे हात हवे असतात
अजून वेळ चुकलेली नाही अनुभव घ्या मैत्रीतील कोरोना ओळखा आणि सावध व्हा
घरी रहा, सुरक्षित रहा
©️ मितेश कदम
ती निर्भया...
दहावीच वर्ष.....
आज दहावीच्या शिकवणीला सुरुवात झाली. दहावी म्हणजे सुट्ट्या कमी आणि अभ्यास जास्त असतो नववी ला होतो तर सगळे म्हणायचे हे खुप महत्त्वाचे वर्ष आहे हे निघालं की दहावी चे वर्ष अगदी सुरळीत जाते आणि दहावी ला कसाबसा आलो तर हे वर्ष आयुष्याची पहिली पायरी आहे असं सांगण्यात आलं हे वर्ष काढलं की बारावी उत्तम रित्या निघेल अस सांगण्यात येत आता खर काय नि खोटं काय परंतु शिक्षण ही काळजी गरज आहे हे तेवढं खर आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण घेतलं की हक्काची भाकर नेहमी मिळवू शकतो पण तशी साथ मिळाली की नक्कीच यशाचे शिखर गाठता येत यात गैर नाही.
नेहमी प्रमाणे शाळेत गेलो पण नवीन वर्गात गेलो की खोली बदलली असते पण मागचे संपूर्ण वर्ष त्या खोलीत घालवलेल्या आठवणी डोळ्या समोर असतात आणि खोली बदलण्याची इच्छा नसते पण नियम सर्वाना असतात मी खालीच वाट बघत होतो कुणी ओळखीचं दिसत का ????
आणि नेमका माझं नाव कानी पडलं .....
ए गण्या.........??????? दिनू ने हाक दिली
दिनू ......माझा जिवलग मित्र माझीच वाट बघत होता त्याने तिसऱ्या मजल्यावरून आवाज दिला
इथे वर वर बघ मी शोध घेत होतो आवाज कुठून येत आहे
तिसऱ्या मजल्यावरून दिनू आवाज देत होता मी तडक निघाली पायऱ्या कापत हापत हापत वर पोचलो
भावा!!!!! कसा आहेस????
दिनू ने उत्तर दिले कसा दिसतोय मी ?????
कडक!!!!! मी उत्तर दिले....
नेहमी प्रमाणे शेवटचा बाक आमचा ठरलेलाच म्हणजे शिक्का मोर्तब केला होता आणि शाळेत असेच नियम असतात सभ्य मुलं पहिल्या बाकावर आणि आम्ही वळू शेवटच्या बाकावर 😉
शाळेचा पहिला क्लास वर्ग शिक्षकांचा बाकावर बसलेल्या मुलांच्या कडे बघत कुणी आल नाही याचे निरीक्षण करत वर्ग शिक्षिका बघत होत्या माझ्या कडे लक्ष देत म्हणाल्या
आलास का रे बाबा......??????
हो बाई तुम्हाला एकट टाकून कस जमेल.........
३ वर्ष झाले बाईंना सर्व मुलांचे स्वभाव चांगलेच परिचयाचे झाले होते त्यामुळे उलट उत्तर देणे हा मागील बाकावर बसलेल्या मुलांचा जन्मसिद्ध हक्कच जणू काही
हजेरी घेण्यासाठी बाई उठल्या पण त्या आधी नवीन वर्षाचे भाषण दरवर्षी प्रमाणे बाईंनी ऐकवायला सुरुवात केली आणि नाविनवर्षं आणि नवीन अटी आणि शर्ती सांगण्यास सुरुवात केली.....
दहावीचे वर्ष हे आयुष्याची पहिली पायरी असत त्यामुळे प्रत्येक मुलाने आपले भविष्य काय ठरवले आहे त्यावर अवलंबून आहे जेवढा जास्त अभ्यास करेल तोच यशाची किल्ली गाठेल हे आमच्या बाईंच नेहमीच वाक्य होत आणि जो विद्यार्थी उशिरा वर्गात येईल त्याला खाली बसवण्यात येईल वर्गपाठ आणि गृहपाठ नित्य नियमाने करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाईल अशी आशा दाखवली जायची दर वर्षी पण बक्षीस काही मिळाले नाही कोणत्याही विद्यार्थ्यांना पण तरीही मुलींची स्पर्धा सुरू होत सर्व तयारीला लागायचे आणि आमचे शेवटचे दोन बाक हे नेहमी प्रमाणे शिक्षकांची टिंगल करण्यात अग्रेसर होते पण जेव्हा अभ्यास सुरू असेल तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यास हा आमचा सर्वांचा नियम
भाषण संपून सर्व शिक्षकांच्या पहिल्या दिवसाचा आरंभ झाला शाळेची घंटा झाली सर्व घराकडे निघाले मी दरवर्षी प्रमाणे सायकल वर शाळेत जात होतो या वर्षी दिनू च्या बाबांनी त्याला शाळेत जाण्यासाठी सायकल घेऊन दिली होती दिनू माझ्या शेजारच्या गावी रहात होता त्यामुळे घरी जाताना आम्ही दोघे सोबतच घरी निघायचो
घरी जाताना चर्चा रंगली अरे ती संजू किती फुगली बघितलिस का तू???? दिनू ने प्रश्न विचारला
हो रे !!!!! पण सुंदर दिसत होती आधी पेक्षा आज छान गजरा आणि गुलाबाचे फुल वेणी मध्ये कोंबून आली होती मी उत्तर दिले
अरे कोंबून नाही रे वेड्या!!!!!!!!दिनू मध्येच म्हणाला
त्याला मळणे अस म्हणतात
मुलींना जन्मापासून सुंदर दिसण्याचा आजार असतो चेहरा काळा जरी असला तरी आरसा जणू काही त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यांना बाकी कुणी दिसत नाही त्या आरश्या शिवाय एकट्याच आरश्या समोर बसून केस कुरवाळत असतात
@संजू माझं आणि वर्गातील प्रत्येक मुलाचं पहिलं प्रेमच जणू काही!!!
दिसायला गोरी गोरी पान , खाकी पावडर सुद्धा फिक्की दिसेल तिच्या समोर अस काही रूप तीच, मन मोहक असे डोळे थोडे निळसर कुणीही बघून प्रेमात पडेल नेहमी केसात गुलाबाचे फुल किंवा रात-राणीच्या फुलांचा0 गजरा मळून संपुर्ण वर्गात त्याचा सुगंध दरवळत असायचा वर्गात प्रवेश करताना जर नाकाला त्याचा सुगंध आला की समजून जायचं वर्गाची परी राणी अवतरली आहे तिला डोळेभरून बघण्याची ओढ असायची
तिच्या गजऱ्याचा एक वेगळा अर्थ सुद्धा होता तो काही सांगता येणार नाही मंडळी.... पण तुम्ही तो मला कळवू शकता
उत्तराची प्रतीक्षा असेल मला???
दहावीच्या वर्गात असताना घरी अभ्यास करता येत नसे सतत काहीतरी अडचण येत असायची माझी बुद्धी जशी बुरशी लागलेली तिचा कधी वापर झालाच नाही सगळं डोक्यावरून जात असायचं मग बाबांनी शिकवणी लावली शिकवणीचा खर्च उचलण्याइतपत आम्ही काही श्रीमंत नाही बाबा पिठाच्या गिरणीवर काम करायचे तेव्हा दोन आणे शेर पीठ मिळायचे आणि शिकवणी ची फी दोन रुपये इतकी आणि शिकवणी चे गुरुजी एकदम हिटलर सारखे त्यांना बघूनच सर्व मुलं घाबरून जायची दिसायला अगदी खुंखार रात्रीच्या स्वप्नात जरी आले तर सकाळी अंथरून ओल ओल झालेलं असायचं एक वेगळीच दहशत होती त्यांच्या आवाजात आणि शिकवणीला जाण्याची इच्छा नसायची पण योगा योगाने संजू सुद्धा तिथेच शिकवणी घेण्यासाठी येत असे.
शालेय शिक्षणात मी फारसा काही हुशार नव्हतो आणि चित्रलेत तर अगदीच भोपळा घेऊन येत आणि चित्रकलेचे गुरुजींनी मला भोपळा नावच ठेवले होते पण माझा मित्र दिनू नेहमी माझी समजूत काढायचा आणि माझं कौतुक करायचा मी नापास जरी झालो तरी दिनू मला हसवायचा आणि म्हणायचा अरे मी आहे ना तुझ्या जोडीला कशाला घाबरतो आणि खर म्हणजे हा दिनू खुप लबाड होता याने मला एकदा येऊन सांगितले की संजूला तू खुप आवडतोस आणि संजूला जाऊन सांगितले की गण्या ला तू खूप आवडते म्हणजे दोघांच्या रेल्वे सुरू करून दिल्या दिनू ने पण आम्ही कधी हिम्मतच केली नाही एकमेकांना आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची आम्ही दिवस भर एकमेकांना डोळे भरून बघत असायचो कधी ती मला गपचूप बघत असायची आणि मी फळ्याकडे बघत गुरुजींना त्रास देत असायचो आणि कधी मी तिच्या कडे एकटक बघत असायचो जेव्हा तिला कळायचे तेव्हा एक झलक देत गोड असे स्मित हास्य करायची नकळत हळू हळू संपुर्ण वर्गातील मुलांना ही बातमी समजली पण शाळेतली मुलं शेवटी कधी सुधरणार्यातली नसतात हे माहीतच आहे त्यांनी लगेचच मला संजू च्या नावाने चिडवायला सुरुवात केली आणि संजू ला माझ्या नावाने त्यांना एक भलताच आनंद मिळत असावा पण मला ते सहन होत नव्हते माझा राग आवाक्याबाहेर जाऊ लागला आणि प्रेम वैगेरे काही नसतं फक्त आकर्षण असत हे स्वतःलाच समजावू लागलो परीक्षा तोंडावर होती आणि माझं लक्ष विचलित होत होते आणि त्याच काळात संजूने तिच्या प्रेमाचे पत्र आणून दिले मला काही कळेना संजू चांगल्या घरातली आणि मी मध्यम वर्गातील सुद्धा नाही मी तिच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार संपुर्ण आयुष्य कस काढणार या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर सापडलं की या सर्व गोष्टीला कुठे तरी आळा बसला पाहिजे मी ते पत्र न वाचताच संजू ला परत दिल आणि तिला समजावून सांगितलं आयुष्य खुप मोठ आहे क्षणिक आकर्षणाने आयुष्य खर्ची जाऊ नये म्हणून योग्य वेळेतच मार्ग बदलायला हवा आणि तो माझा आणि संजू च्या आयुष्यातील शेवटचा दिवस निघाला त्यानंतर संजू ने मला तिचा चेहरा कधी दाखवला नाही आणि मी सुद्धा तिचा चेहरा बघण्यासाठी कधी गेलो नाही हृदयात तिच्यासाठी खुप भावना होत्या पण त्यांचा नाईलाजाने अंत करावा लागला कदाचित तो चांगल्यासाठी सुद्धा असेल हरकत नाही
जर आपल्या एखाद्या निर्णयाने समोरच्या व्यक्तीचे नुकसान टळत असेल तर तो निर्णय घेण्यात हरकत नाही आणि आपण सुद्धा कधी स्वार्थी विचार करू नये अशी माझी भावना आहे
लवकरच दहावीच्या परीक्षा कालावधी सुरू झाला मी अजून सुद्धा संजूच्या विचारातून बाहेर निघालो नाही मी तिला शरीराने लांब तर केले परंतु तिचे विचार अजूनही डोक्यात घर करून होते दिवस रात्र नजरे समोर तीच तीच आणि फक्त तीच त्या मुळे अभ्यासात काही लक्ष लागेना आणि अखेर परीक्षा सुरुवात झाली आणि योगा योगाने दिनू माझ्या पुढील बाकावर आला मला वाटलं जणू देव माझ्यावर प्रसन्न झालाच असावा पण त्या दिवशी मला दिनू चा खरा चेहरा जाणवला
मराठी चा पपेर आणि मानसिक त्रासाने वाचन काही लक्षात राहील नाही आणि प्रत्येक परीक्षेत असा एकही विद्यार्थी नसेल की त्याने रिकाम्या जागा स्वतः पाठ करून लिहल्या असतील रिकाम्या जागा विचारूनच लिहतात बहुतेक त्यातील मी सुद्धा एक
मी दिनू ला विचारलं दिनू उत्तरे सांग ना ?????
जर मी तुला उत्तरे सांगितली तर तू माझ्या पुढे जाशील आणि मला ते कदापि सहन होणार नाही स्वतः चा अभ्यास स्वतः कर आणि उत्तरे लिहून पास हो !!!!! दिनू ने उत्तर दिलं
मला हे उत्तर ऐकून जरा धक्काच बसला माझा जिवलग मित्र मला अशी उत्तरे देतो म्हणजे नक्कीच मी माणसे ओळखण्यात कुठे तरी चुकतो
त्यानंतर संपूर्ण परीक्षेत दिनू सोबत एकदाही बोलणे झाले नाही आणि दिनू ने दहावीच्या परीक्षेत ८०% मार्क मिळवले पण मी कुठे तरी कमी पडलो भरकटलो आणि ३९% मार्क घेऊन निराशेने घरी आलो तेव्हा मला कळून चुकले की.......
आयुष्यात आपले लक्ष विचलित करणारे खुप क्षण येतात आणि आपण त्यांच्या सोबत भरकटले जातो त्यामुळे आपल्या शैक्षणिक आणि पारिवारिक जीवनावर त्याचा ठसा उमटला जातो जो कधीही पुसता येणार नाही जणू असा काही आणि त्यामुळेच एकच ब्रीद वाक्य लक्षात ठेवावे ""एकटाजीव, सदाशिव""
©मितेश कदम
सोमवार, ६ एप्रिल, २०२०
एक कल्पना
शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०
निर्मळ प्रेम ...
बुधवार, १५ जानेवारी, २०२०
मला एक बहीण हवी.......
वेदांत लहानपना पासून तो एकटाच वाढला त्याच्या सोबत खेळायला कुणीच नसायचं तो सतत आई बाबांना म्हणायचा आई बाबा मला एक लहान बहीण द्याल का आणून???
त्याला कुणीतरी सांगितलेल असत की देव बाप्पा येतो आणि बहीण भाऊ देऊन जातो. तो लहानगा सतत देवाला सांगायचा की मला एक गोड गोंडस अशी बहीण दे पण कधी आई बाबांनी त्याच ऐकल नाही आणि कधी देव बाप्पा ने ही त्याच ऐकल नाही.
कालांतराने तो शाळेत जायला लागला शाळेत खुप साऱ्या मुले मुली असायचे पण त्याच्या मनात एकच खंत असायची की माझ्या शाळेतील सर्वाना एक भाऊ आणि बहीण आहेत मी एकटाच आहे. देवाने का मला एकट ठेवलं असेल की काहीतरी चुकीचं केलं की???
एके दिवशी तो संध्याकाळी शाळेतून घरी आला आणि देव घरात जाऊन मुसमुसत रडत होता आई ने पाहिलं की आपला वेदांत घरी आलाय वाटत पण आज मला आवाज न देता रडत का बसला आहे हे बघण्यासाठी ती देव घरात जाते?????
आई:- काय झालं बाळा??
वेदांत:- मला बहीण हवी माझ्या सोबत खेळायला मी एकटाच आहे देवाने मला एकट्याला का आणलं माझ्या सोबत एक बहीण पण आणायची होती ना त्याला समजत नाही का ????
आई:- अरे बाळा अस नाही काय तो देव बाप्पा खुप कामात असल्यामुळे तुला बहीण नाही आणू शकला मग त्यात रंगवण्याच कारण काय???
वेदांत:- शाळेतील मुलं बोलत होती की तू वाईट आहेस म्हणून तुला बहीण नाही दिली?????
आई :-अस काही नाही बाळा ते तुला मुद्दाम चिडवण्यासाठी तस बोलत होते तू जा बघू आधी फ्रेश हो मग तुझ्या आवडीचे लाडू देते मी तुला
तो तसाच पाय आपटत हात पाय धुवायला निघून गेला रात्री त्याचे बाबा आले तोवर वेदांत झोपला होता त्यांनी विचारलं काही खाल्लं का त्यांनी एवढ्या लवकर कसा काय झोपला आज तो
आई म्हणते त्याला बहीण हवी कुठून आणूया त्याला बहीण..........
मला एक बहीण हवी...................
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत भांडणारी,
प्रत्येक रक्षाबंधन च्या दिवशी राखी बांधणारी,
त्याचे खुप खुप लाड करणारी,
प्रत्येक भांडणात आई बाबांना मध्ये आणणारी,
ती घरात नसेल तर घर मोकळं मोकळं वाटणारी,
स्वतःचा खाऊ खाऊन माझा खाऊ मागणारी,
आई नसताना आई च प्रेम देणारी,
आई च्या जेवणाची नक्कल करणारी,
देखणी नसली तरी सतत आरश्या समोर नटणारी,
सतत दादा दादा करणारी मला एक बहीण हवी.... होती
आज तो तरुण झालाय त्याला त्याच्या आई बाबांनी दत्तक घेतले होते हे त्याला वयात आल्यावर त्याच्या आई बाबांनी सांगितले
त्यावेळी जर एखादी मुलगी दत्तक घेतली असती तर तिच्या शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च येऊ नये म्हणून त्यांनी मुलगा दत्तक घेतला कारण मुलगा आई वडिलांच्या म्हातारपणाचा आधार असतो आणि मुलगी हे ओझं असत म्हणून अनाथ मुलींना लवकर कोणीही दत्तक घेत नाही आजही खुप भेदभाव केला जातो मुला मुलींच्या मध्ये हे चित्र कधी बदलेल देव जाणे
पण त्याला नेहमी हीच खंत असायची मला सुद्धा एक बहीण हवी.......
पण आज वाटत की खरच मला बहीण नाही ते खुप बर आहे आज तर ती असती तर ती कितपत सुरक्षित असती समाजात काही कल्पना नाही याची पावला पावलावर नराधम उभे आहेत तिचा डोळ्यानेच बलात्कार करणारे नराधम आहेत शाळेत, कल्लासेस, ऑफिस, समाजात नुसते नराधम आहेत ती कुठेच सुरक्षित नाही. घरातून निघाल्यापासून तिला शाळेत, ऑफिसात जाई पर्यंत स्वताचे कपडे सांभाळावे लागतात. आणि नकळत शरीराचा एखादा भाग दिसला की लोक अशी बघतात की त्यांनी कधी हे चित्र पाहिलच नाही आणि त्यावरून मुलीवर वाईट संस्कार झालेत असे दोष लावले जातात.
जर प्रत्येक पुरुषाने हे जाणून घेतले पाहिजे की आपण दुसऱ्याच्या आई बहिणीवर वाईट नजरेने पाहतो त्याच नजरेने जर कोणी आपल्या आई बहिणी कडे पाहिलं तर तळ पायाची आग मस्तकात जाते तशीच आपण पाहणारी स्त्री सुद्धा कुणाची तरी आई आणि बहीण आहे
पुरुष कधी स्त्री किती त्रास सहन करते यावर विचार करीत नाही
महिन्यातील पाच दिवस म्हणजे ते नरक यातने पेक्षा कमी नसतात पुरुष त्यावरून सुद्धा त्यांची खिल्ली उडवतात पण ते त्यांनाच माहिती की किती त्रास होतो
गर्भ धारण झालेल्या स्त्री ला बघून आपण हसतो पण कधी विचार करावा की अडीच ते तीन किलोचा गोळा पोटात ९ महिने ९ दिवस तळ हातावरील भाजलेल्या फोडा सारखा जपावा लागतो अनुभव घ्यायचा असेल तर एक दिवस रात्र अडीच किलो चा गोळा पोटाला बांधून फिरावं तेव्हा नक्की कळेल की आपल्या आई ने ९ महिने ९ दिवस किती त्रास सहन केला असेल
छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त पायांची नखे बघून त्यांच्या मुखातून उदगार निघाले होते "" अशीच आमुची आई असती,
आम्ही सुद्धा इतकेच सुंदर झालो असतो""
मला देवाने सख्खी बहीण नाही दिली पण नकळत इतक्या गोड बहिणी दिल्या की त्यांची कधी कमी भासली नाही
कथा आवडली असल्यास नक्की टिप्पणी द्यावी ही विनंती
आणि ""प्रत्येक स्त्री चा मान हीच महाराष्ट्राची शान""
सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९
ती आणि मी पण.........
आज तुला पहिल्यांदा पाहिलं खुप खुश झालो तुला बघून
पहिल्यांदा नजरेला नजर भिडली तेव्हाच कळलं की आपल्यात काहीतरी आहे पण कधी वाटलं नव्हतं की अस आठवणीत ते शब्द ठेवावे लागतील
मला नेहमी वाटायचं की मजल्यावर जो कोणी प्रेम करेल त्याला मी प्रेमा शिवाय खूप काही देईन पण कधी असा विचार नाही केला की मला सुद्धा प्रेमा सोबत खूप काही मिळेल
पण या मध्ये एक गोष्ट राहिली तुम्हाला माहित आहे का ती???

या मध्ये खर प्रेम राहील एकमेकांना देणारे वादे राहिले आणि खर म्हणजे एकमेकांना दिलेली वचने राहिली जर एखादा व्यक्ती प्रेम करतो तर तो या सर्व गोष्टी करतो पण मी अस काही केलं नाही कारण हे सर्व घडण्या आधीच जर ती व्यक्ती माझ्या पासून लांब गेली असेल ते मी काय करणार त्यासाठी
आणि आपण कधी तेवढ्या लांबचा विचार नाही करत की कोण माझ्या जवळ राहणार आहे कोण नाही राहणार यावर आपण कधी विचार नाहीकरत मुळातच.

तो व्यक्ती जोवर आपल्या सोबत आहे तोवर आण त्याच्यासोबत प्रेमाने राहतो खरी गोष्ट तेव्हा कळते जेव्हा प्रसंग निर्माण होतो
आज ती माझ्या सोबत नाही परंतु ती जेव्हा सोबत होती तेव्हा कधी मी तिला दोष नाही दिला म आज तिला दोष देऊन काय प्राप्त होणार माणसाने आपल्या कडे जे आहे त्यात जास्त सुखी राहावं जे नाही त्याची खन्त करत बसण्यात निव्वल मूर्खपणा आहे
तिने आयुश्यात सुखी राहावं हीच प्रार्थना
धन्यवाद आपला अमूल्य वेळ देऊन कथा वाचली त्याबदसल आपले आभार
लवकरच येत आहे नवीन कथा घेऊन
आपला
-©मितेश कदम

प्रिय शिरीन....
प्रिय, शिरीन. विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???" प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत न...
-
नमस्कार मी बऱ्याच कथा पहिल्या वाचल्या त्यामध्ये हा विषय कधी मिळालाच नाही त्या मुळे आज बहिणीवर काही ओळी मांडण्याचा विचार आहे. वेदांत लहान...
-
आठवणीतले चार दिवस आज तुला पहिल्यांदा पाहिलं खुप खुश झालो तुला बघून पहिल्यांदा नजरेला नजर भिडली तेव्हाच कळलं की आपल्यात काहीतरी आहे पण कधी...
-
पहिल्यांदा पाहताच कुणी प्रेमात पडत का?? हा प्रश्न मी नेहमी स्वतःला विचारत असतो आणि त्याच उत्तर नकळत कधी सापडत सुद्धा नाही. कारण मला माहीत आ...