बुधवार, २७ मे, २०२०

कोरोना एक अविशाप

नमस्कार,
मी एक सामान्य समाज सेवक आणि आमची आई अंगणवाडी मध्ये मागील २५ वर्ष झाले सेविका म्हणून कार्यरत आहे त्यादिवशी केंद्र सरकार कडून आलेले धान्य वाटप करण्यासाठी मी आणि आई अंगणवाडी मध्ये गेलो २३ एप्रिल रोजी सदर महिला आमच्या संपर्कात आली आणि २५ एप्रिल रोजी सदर महिला कॉविड १९ पॉझिटिव्ह आली

त्यामुळे २६ तारखेला मला आणि माझ्या परिवाराला ऐरोली येथील महानगरपालिका इस्पितळात चाचणी करण्यासाठी सकाळी ९ च्या सुमारास नेण्यात आले सोबत एकूण २७ संशयित आणि ७ लहानमुले असे सर्व शेजारील लोक होते ऐरोली च्या इस्पितळात नेताना सर्व लोक सर्कस मधील जनावरांना नेताना जसा आनंद घेत होते आणि मोबाईल काढून व्हिडीओ काढत होते माझ्या जीवाला चटका लागला आपण समाजासाठी एवढे जीवापाड मदत करतो पण त्याच्या मोबदल्यात अशी परत फेड मिळते असो. त्यानंतर आमच्या सर्वांच्या चाचण्या घेत ४ वाजले तिथे ना पाण्याची सोय नाही जेवणाची सोय सर्व लहान मुले भुकेने कळवळत होती तिथल्या काही अधिकाऱ्यांनी कळवलं की विलगीकरण कक्षात पोचल्यावर तुम्हाला जेवण देण्यात येईल त्यानंतर १४ वर्षाच्या लहान मुलांच्या सोबत एक पालक वाशी येथील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आणि बाकीचे २० सांशीयीत पनवेल येथील इंडिया बुल्स विलगीकरण कक्षात एकाच अँबुलन्स ने नेण्यात आले सदर अँमबुलन्स ची क्षमता ४ संशयित नेण्याची असताना त्यात वडाप भरल्या सारखे भरगच्च २० व्यक्ती कोंबण्यात आले सायंकाळी ५ च्या सुमारास पनवेल येथील विलगीकरण कक्षात पोहचविण्यात आले सकाळ पासून सर्व संशयित उपाशी काहीही न खाता आणि पिता या आशेत होते की लवकरच काहीतरी खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी पाणी मिळेल काही तासांनी मी तेथील कर्मचाऱ्यांना विचारपोस केली असता लवकरच काहीतरी देण्यात येईल अशी आशा दाखविण्यात आली परंतु रात्रीचे ९ वाजले परंतु पाणी सुद्धा मिळाले नाही जसे कारागृहात कैद्यांना बसवले जाते तसेच काही आमच्या सोबत देखील घडले इमारतीच्या एका कोपऱ्यात सर्व संशयित बसून होते ४ तासानंतर एका कर्मचाऱ्यांची नजर पडली त्याने आश्वासन दिले की लवकरच तुम्हाला खोली आणि जेवणाची सोय केली जाईल अशी आशा दाखवली रात्रीचे १० वाजले ५ तासानंतर सुद्धा पाणी नाही जेवण नाही भुकेने पोटात गोळा येत होता सदर वागणुकीने त्रस्त होऊन मी पुन्हा त्या कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांचे उत्तर माझ्या कानातून रक्त येण्यासारखं होत "इतक्या लवकर काही मिळणार नाही तुम्ही काही आमदार खासदार नाही किंव्हा आमचे कुणी नातेवाईक नाहीत की तुम्हाला इथे पाहुणचार मिळेल आणि असच १४ दिवस कुत्र्यासारखा राहण्याची तयारी ठेवा" आणि "तुम्हाला कुत्र देखील विचारणार नाही अशी उत्तर मिळत होती" तेव्हा आमच्या सर्वांच्या आशा एकाच व्यक्तीकडे होत्या तो म्हणजे तेथील पोलीस निरीक्षक माझे वडील पोलीस बांधवाकडे मदत मागण्यांसाठी त्याच्याकडे गेले असता त्याने वडिलांना शिवीगाळ करत म्हणाला "म्हाताऱ्या तिकडे लादिवर झोप नाहीतर एक खानाखाली देईन" असे उत्तर जेव्हा माझ्या कानी पडले तेव्हा माझा पारा चढला काय करू काय नको असे झाले होते आपण ज्यांना आपले रक्षक म्हणतो तेच आपले भक्षक असतात हे त्यावेळेस मला कळलं आपण त्यांना आपले मित्र म्हणतो आपले रक्षक म्हणतो परंतु दुर्दैवाने ते त्यातले नाहीत हे त्यादिवशी स्पष्ट झाले आणि मी ट्विट करण्याचा निर्णय घेतला रात्री १०:१५ च्या सुमारास मी ट्विट केलं की
""'' मागील १३ तासापासून आम्ही उपाशी आहोत आम्हाला नाही पाणी मिळाले आहे आणि नाही जेवण खोली मिळण्याची सुद्धा आशा नाही आहे माझे आई वडील वयस्क आहेत त्यांची दुरवस्था होत आहे आई एक स्त्री असल्याने त्यांना होणारा त्रास काही सहन होत नाही"""" जमल्यास आपली मदत मिळावी सदर ट्विट करताच ट्विटर वरील #मायमराठी कुटुंबातील सर्व सदस्य ट्विट चा पाठपुरावा करत मदतीचा हात मागत होते त्या एका ट्विट ला खुप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि सर्व जनतेकडून आणि राजकारणातील नेत्यांच्या कडून मदतीचे हात हाथ पुढे येऊ लागले
तिथे एकूण दहा इमारती होत्या प्रत्येक इमारत २९ मजली प्रत्येक मजल्यावर एकूण ३० खोल्या होत्या अश्या एकूण दहा इमारती होत्या त्यापैकी तीन इमारती मध्ये आधीच काही संशयित ठेवण्यात आले होते आणि दहा पैकी दोन इमारती पॉझिटिव्ह रुग्णांकरिता ठेवण्यात आल्या होत्या.
त्या नंतर मध्यरात्री ११:४० च्या सुमारास खोली मिळाली प्रत्येकाला स्वतंत्र खोली देण्यात आली परंतु अजूनही पाणी आणि भुकेने व्याकुळ झालेले पोट काही ऐकत नव्हते तेव्हा माझे बोलणे नुकतेच नवी मुंबई कमिशनर सोबत झाले होते की लवकेच जेवण मिळेल कारण माझ्या ट्विटला सर्वानी पाठिंबा दिल्या नंतर १२.१५ च्या सुमारास जेवण मिळाले पण पाणी पिण्यासाठी वापरलेल्या मोकळ्या बाटल्या दिल्या आणि सांगितले एक पाणी पिण्याची मशीन आहे त्यातून सर्वानी पाणी भरावे एका मजल्यावर ३० खोल्या आणि एक पाणी भरण्याचे मशीन अश्याने सामाजिक अंतर कसे पाळावे हा मोठा मुद्दा होता त्यानंतर सर्वानी ट्विटला दिलेल्या प्रतिसादाने रात्र भर राजकारणी लोकांचे फोन सुरू झाले ""मी मदत करतो - मी मदत करतो"" माझे आभार व्यक्त कर माझे नाव ट्विट कर असे अनेक फोन आले राष्ट्रवादी, काँग्रेस , मनसे कार्यकर्त्यांनी फोनचा रात्रभर पाऊस पाडला. त्यानंतर पहाटे ३ च्या सुमारास नवी मुंबई पोलीस कंट्रोल रूम मधून फोन आला की तुम्ही दिल्ली ला तक्रार केली आहे परंतु वास्तविक मी कुठेही तक्रार नोंदवली नाही मी केलेल्या ट्विट मध्ये जनतेने इतक्या प्रमाणात सर्व राजकीय शासकीय त्यानंतर बातमीदार सर्वांना गुंतवले होते की सर्वांनी मला फोन केले आणि पोलीस मला जाब विचारत होते ते मदतीच्या हेतूने बोलत होते की दमदाटीच्या हेतूने बोलत होते हे काही कळेना दिवस भर उपाशी पोटाने त्रास दिला होता आणि आलेला थकवा काही थांबत नव्हता त्यानंतर पोलिसांनी पहाटे ४-५ च्या सुमारास पोलिसांची एक तुकडी पाठवली माझ्या मदती करीता आणि मला खाली बोलवण्यात आले त्यांनी विचारपोस केली तक्रार करण्याचे कारण काय आम्ही इथे आहोत वर पर्यंत तक्रार का केली असा जाब विचारत होते परंतु जेव्हा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना मदतीचा हात मागितला तेव्हा ते केकसत होते आणि नंतर आलेले पोलीस कर्मचारी आम्ही आहोत ना वर पर्यंत तक्रार का केली हा जाब विचारत होते नक्की सामान्य माणसाने करायचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्यानंतर काही त्रास असल्यास आम्हाला मदत माग वर पर्यंत तक्रार जाता कामा नये असे ठासून सांगितले. सकाळी आणखी काही वरिष्ठ मंत्र्यांच्या ऑफिसातून फोन आले आम्ही मदत करू असे आश्वासन देण्यात आले परंतु खोली मध्ये अत्यावश्यक वस्तूंची सोय नव्हती(उदा; पाण्याची बदली, झोपण्यासाठी बेड, उशी, पिण्यासाठी पाणी, जेवणासाठी थाळ्या, इ.)त्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागला त्यानंतर पहिला दिवस उजाडला सकाळचे १० वाजून गेले नाष्टा आणि चहा सुद्धा आला नाही आदल्या दिवशी उपाशी पोटाने हाल केले आणि आजची परिस्थिती सुद्धा सारखीच असेल का या भीतीने लोक खोलीत बसून होते. दुपारी १२.१० च्या सुमारास कंत्राटी कामगार चहा देण्यासाठी आला परंतु चहा घेण्यासाठी ग्लास घरून घेऊन यायचे असते असे तेव्हा कळले त्या नंतर दुपारी जेवणाची वाट बघत सायंकाळ उजाडली सायंकाळी ४.४५ च्या सुमारास जेवण आले त्यावेळी कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता तुम्ही आला आहात याची त्यांना कल्पना नव्हती त्यामुळे जेवण दिले नाही अशी बाब समजली आणि तोही दिवस निघून गेला तो वनवसातील पहिला दिवस होता त्यानंतर जे काही लोक माझ्या संपर्कात आले होते ते
स्वार्थी लोक सतत फोन करत होते त्यांना माझ्या प्रकृती बद्दल चिंता नव्हती तर काही व्यक्तींच्या संपर्कात मी आलो असल्यानं त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती परंतु चाचणीचे अहवाल कधी मिळतील याची कल्पना कुणालाही नव्हती तिसऱ्या दिवशी अत्यावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले तोवर ओंजळीने अंघोळ करण्याचा लाभ घेतला आणि लादिवर झोवण्याचा अनुभव असल्यामुळे ते काही जड गेले नाही चौथ्यादिवशी अहवाल येतील अशी आशा देण्यात आली होती परंतु अहवाल काही आले नाही परंतु पाचव्या दिवशी आमच्या सोबत आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे सर्वांच्या मनात भीतीने घर केलं कारण चाचणी घेतल्यानंतर आम्ही सर्व २० संशयित एकत्र एकाच गाडीने आलो होतो त्यामुळे नवी मुंबई चे नोडल ऑफिसर आणि कमिशनर यांना ई मेल द्वारे पत्र दिले की आमच्या सर्वांची दुसरी चाचणी त्वरित घेण्यात यावी परंतु त्यावर विचार करावा लागेल असे उत्तर त्यांच्या कडून मिळाले त्यामुळे अस्वस्थता वाढली त्या नंतर त्याच रात्री आईची प्रकृती खालावली आणि माझ्या मनात भीतीने घर केलं मी कावरा बावरा झालो होतो जेव्हा वेळ आपल्यावर येत तेव्हा खर दुःख कळत ही खोटी गोष्ट नाही त्यानंतर मी थेतील डॉक्टर यांची मदत मागितली असता त्यांनी मला ऑनलाईन तक्रार करा अशी माहिती मिळाली त्यानंतर मी ऑनलाईन वेबसाईटवर नवी मुंबई मुख्य कार्यालयातील संपर्क शोधला आणि त्वरित त्यांना फोन केला रात्री १२ ते १ च्या सुमारास डॉ. उज्वला ओतुर्कर या कार्यरत होत्या मी आजही त्यांच्या कार्याला सलाम करतो एक स्त्री असूनही त्या रात्री रुग्णांच्या सेवे करीता रुजू होत्या यांनी त्वरित इंडिया बुल्स पनवेल येथील डॉक्टरांना फोन करून साहाय्य करण्याचे आदेश दिले आणि मला त्वरित मदत मिळाली त्यांचे आभार मी आयुष्यात कधी विसरणार नाही आणि त्यांनी आश्वासन दिले की आणखी काही मदत लागल्यास नक्की कळवा अशी विनंती केली
२ तारखेला आलेल्या अहवालात सदर व्यक्ती पॉझिटिव्ह आला त्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले नव्हते किंवा इतर काही औषध उपचार सुद्धा सुरु करण्यात आले नव्हते त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्ती मानसिक दबावाखाली आला होता त्याला ५ वर्षाची लहान मुलगी त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर जबाबदार कोण असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला असता त्यावर असे उत्तर मिळाले की आम्ही मोजकेच अधिकारी कुठे कुठे पाहणी करणार परंतु सतत पाठपुरावा घेत असल्यामुळे अखेर ६ दिवसानी त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह आरक्षित इमारती मध्ये हलविण्यात आले परंतु १४ दिवस उलटून गेले तरीही दुसरी चाचणी घेण्यात आली नाही तेव्हा मी तेथील अधिकारी आणि डॉक्टर यांना जाब विचारला असता टोलवा टोलवीची उत्तर मिळाली परंतु सोबतच असे काही व्यक्ती आले की जे तिथे २८ दिवसा पासून विनवणी करत होते की केव्हा त्यांना सोडण्यात येईल बाकी सर्व बेलापुर, नेरुळ, घणसोली, तळवली, ऐरोली दिवा गाव येथील संशयित असून काहींना १४-१८-२२-२८ दिवसापासून तेथेच अडकून होते परंतु जेव्हा जेव्हा ते जाब विचारायला जात असत त्यांना हुरकवून लावण्यात येत होते परंतु ९ तारखेला सर्वांचा प्रतिक्षेचा बांध तुटला आणि १०० ते २०० व्यक्ती खाली उतरले आणि त्या जमावाने अधिकाऱ्यांना धारेवर धरले आमच्या पैकी अर्धे इमारतीच्या खिडकीतून तमाशा बघत तसेच होते मी त्वरित नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना फोन करून सूचना दिली त्यानंतर पोलीस आयुक्त तेथे आले येताना त्यांनी स्वतःचा फौज फाटा घेऊनच आले जसे की आम्ही त्यांच्यावर हल्ला करणार आहोत परंतु मी आणि माझ्या सोबतच एक युवक होता आम्ही दोघांनी त्याच्या सोबत चर्चा केली त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली तेव्हा त्यांनी आश्वासन दिले की आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत घरी सोडण्यात येईल तेव्हा सर्वानी सुटकेचा श्वास घेतला आणि आप आपल्या खोलीत निघून गेले परंतु दिलेल्या आश्वासन नक्की खरे आहे का यावर मनात शंका निर्माण झाली परंतु संध्याकाळी अचानक ७ च्या सुमारास लोकांची झुंबड उडाली घरी जाण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या घरी जाण्यासाठी आतुर होता आणि गाड्यांची व्यवस्था कमी असल्याने काही लोकांना दुसऱ्या दिवशी सोडण्याचा निर्णय घेतला ८ च्या सुमारास काही इमारतीच्या दरवाज्याला टाळा लावण्यात आला कारण खुप मोठ्या प्रमाणात लोक घरी जाण्यासाठी निघाले होते आणि तिथे सोशल डिस्टन्स चे पार बारा वाजवले होते लोकांनी तरीही आम्ही विचार केला की एवढ्या गर्दी मध्ये घरी जाण्यापेक्षा एवढे दिवस थांबलो तर आणखी एक दिवस थांबुयात परंतु तेवढ्यात एक व्यक्ती माझ्या मजल्यावर सांगण्यास आला की ज्यादा गाड्या सोडत आहे जर तुम्हाला घरी जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही खाली जाऊ शकता तेच रात्री ११ च्या सुमारास खाली गेलो असता तेव्हा चित्र वेगळंच पाहायला मिळालं २० ते २५ डॉक्टरांची फौज तैनात होती मागील १४ दिवसात एकही डॉक्टर नजरेने दिसला नव्हता रुग्णांची चाचणी सुद्धा कंत्राटी असलेले कामगार घेत होते आणि आज निघायच्या वेळी एवढी फौज दिसणे आश्चर्यच होते आणि काही अक्कल शून्य माणस पालिकेने दिलेल्या अत्यावश्यक वस्तू म्हणजेच बादल्या,चादर,जेवणाची ताटे घरी घेऊन चालली होती तेव्हा माझा पारा चढला आणि त्यांच्या सोबत वाद सुद्धा झाला की प्रशासन तुमच्या सोई साठी वस्तू देत आहे घरी नेण्यासाठी नाही काही सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी वस्तू तिथेच ठेवून दिल्या पण त्याआधी बऱ्याच लोकांनी वस्तू पळवल्या सुद्धा आपणच जर आपल्या प्रशासनाला लुबाडले तर नक्कीच तोटा आपलाच आहे हे लोकांना कधी कळून चुकेल देव जाणे
मागील १४ दिवस नक्कीच वनवासात काढले काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या त्यामुळे काही गोष्टी कथे मध्ये नमूद केल्या नाही आहेत
जर प्रत्येकाला आपली जबाबदारी कळली तर नक्कीच असे दिवस कुणाच्या वाट्याला येणार नाहीत आणि शत्रूच्या वाट्याला सुद्धा असे दिवस येऊ नये अशी प्रार्थना करेन पण खर सांगायचं झालं तर एका विषाणूने माणसातला खरा स्वार्थी माणूस दाखवून दिला प्रत्येक जण स्वार्थी असतो हे कळवून दिले कोण आपलं जिवलग नाही सगळे स्वार्थासाठी जन्माला आले आहेत मित्र नाही आणि मैत्रीण सुद्धा नाही एकटे आलो एकटेच जाणार आहोत हे नक्की आहे


एका मायक्रो कोरोना विषाणूमुळे माणसातल्या खऱ्या स्वार्थी जाती दाखवल्या
कोण आपले आहेत कोण परके हे कळवून देण्यासाठी कोरोना जन्माला आला असावा त्याने जेवढं नुकसान केलं त्या पेक्षा जास्त अनुभव दिला कदाचित पुढे यापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण होणार असावी त्यामुळे ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी आताच घात केला म्हणजे यापुढे प्रत्येकाने माणसे जोडा पण त्याच्या आधी त्यांची परीक्षा घ्या त्यानंतरच जवळ करा कदाचित आजवर तुम्ही खुप माणसं जोडली असतील पण तुम्हाला कोरोना झाल्यावर ते तुम्हाला काळजी घे अशी मनस्थिती देण्यापेक्षा तू माझ्या संपर्कात का आला? हा प्रश्न विचारतील कारण त्यांना केलेल्या मदतीची किंवा त्यांच्या मैत्रीची जाणीव नसावी अशी माणसं आज उपयोगी नाही आली तर आयुष्याच्या शेवटी कशी उपयोगी येणार पण मी एवढे मित्र मिळाळवले ज्यांनी मला आजवर पाहिलं सुद्धा नसावं त्यांनी फोन करून एवढ्या मानसिकते मध्ये उभं केलं की आम्ही आहोत आपण जगाला हरवू शकतो हा तर इवलासा कोरोना आहे अश्या परिस्थिती मध्ये आर्थिक नाही तर मानसिक धीर देणारे हात हवे असतात
अजून वेळ चुकलेली नाही अनुभव घ्या मैत्रीतील कोरोना ओळखा आणि सावध व्हा

घरी रहा, सुरक्षित रहा

©️ मितेश कदम

ती निर्भया...

आजवर लहान मुलींवर लहानपणी त्यांच्या आयुष्याचा खेळी केली जाते आणि ते कोणी बाहेरचे नाही तर घरातीलच नराधम असतात सध्या त्यांची सुरक्षितता धोक्यात आहे विश्वासाने जगावं तरी कसं हा मोठा प्रश्न आज अशीच एका निर्भयाची कथा सतर्क राहण्यासाठी मांडत आहे कृपया याचा कथेचा वेगळा अर्थ काढू नये.  मुलगी म्हटलं की सर्व पुरुषांच्या नजरेत भरते ती सुंदर अशी कामुक स्त्री तीच स्त्री लहान असताना गोड गोंडस अशी गुबगुबीत परी अश्याच एका मुलीचा जन्म झाला सर्व परिवारात आनंदाच वातावरण होत तिच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुलगी झाल्यावर बर्फी वाटतात त्याने संपुर्ण इस्पितळात पेढे वाटले होते. खुपच सुंदर क्षण होता तो त्या आई साठी आणि त्या वडिलांच्या साठी. लवकरच तिचे बारसे झाले नाव नियती(काल्पनिक) ठेवण्यात आलं असे सुंदर नामकरण करण्यात आले हळू हळू नियती मोठी होत होती तिचे ते बोबडे बोलणे, तुरु तुरु चालणे एक नवलच असते. तिचा तिच्या वडिलांवर खूपच जीव होता आणि प्रत्येक मुलीचा तिच्या आई पेक्षा वडिलांवर खुप प्रेम असत करण प्रत्येक मुलगी तिच्या बाबांच्या साठी ही परी पेक्षा कमी नसते . नियती आता शाळेत जात होती तिला तिचे बाबा दररोज शाळेत सोडायला जायचे आणि आई रंजना (काल्पनिक) शाळेतून घरी आणायची.हा नित्याचा कार्यक्रम असायचा..


नियतीचे बाबा तिला प्रत्येक रविवारी बागेत खेळायला घेऊन जायचे. आज रविवार होता नियती सकाळ पासून बाबा उठा ना बागेत जायचं आहे किती वेळ झोपणार आज मला सुट्टी आहे शाळेला तुम्ही दर रविवारी असेच करता उशिरा उठता आणि मला संध्याकाळी बागेत घेऊन जाता मला खेळायला मिळतच नाही. शेवटी बाबा उठले त्यांच्या नियती चे ऐकून नियती तिच्या घरात जाऊन भांडी घेऊन आली खेळायला तोवर बाबा अंघोळीला निघून गेले बाबांना माहीत होतं खेळण्यात मग्न झाली की दुपार उलटून जाईल तोवर माझी कामे उरकून घेतो असेच काही घडले पण आज रंजनाच्या माहेरून फोन आला संध्याकाळी जेवायला या जावईबापू बाबांनी नक्की केलं आणि नियती ला
आवाज दिला
नियती मामाच्या घरी जायचं आहे !!!!
येणार ना????
नियतीने उत्तर दिले हो!!!!
बाबा टला जाऊया लगेच
आता नाही रे बाळा संध्याकाळी बाबांनी दिलेलं उत्तर बाबा मग आज बागेत नाही जायचं का????
नाही म्हणून बाबा निघून गेले अंघोळीला नियती पुन्हा खेळण्यात मग्न झाली बाबांनी आई ला सांगितले तुझ्या माहेरून फोन आला होता संध्याकाळी जेवायला या म्हणून आपल्याला जायचं आहे दुपारी निघुयात दुपार झाली नियती तयार झाली आणि आई च्या मागे लागली आई आवर ना ग पटकन मामाच्या घरी जायचय ना.... झालं ग बाई तुला नेहमी घाई असते बाबा चल ना रे हो बाळा कपडे तरी घालू दे मला बाबांनी उत्तर दिलं नियती रुसून बाहेर पायरी वर जाऊन बसली जेमतेम ६ वर्षांची गोरी गोरी पान , फुलांच्या सारखे मखमली गाल, डोळे निळसर घारे, डोक्यावर दोन पोनी बांधलेल्या,डोळ्यांवर केस येऊ नये म्हणून बँड लावलेला त्यावर सुंदर दोन फुलपाखरं बसलेली,खांद्याला पर्स अडकवलेली, जांभळा सफेद फ्रॉक, ओठांना गुलाबी रंगाची लिपस्टिक, कपाळाला सुंदर टिकली , आणि पावडर भरभरून लावलेली मुलींना लहानपणापासूनच सुंदर दिसण्याचा मोह असतो. लवकरच ते सर्व गाडीने निघाले नियती बाबांच्या पुढे बसली ती पर्स सतत खांद्यावरून पडत होती बाबांनी सांगितलं बाळा ती आई कडे दे ती ठेवेल जपून नको ना बाबा तरीही बाबांनी फी काढून रंजनाच्या हातात दिली थोड्याच वेळात ते रंजनाच्या माहेरी पोचले तिथे मुलगी आणि नात येणार म्हणून तयारी चालू होती जेवणाची नियती तिथे पोचल्या पोचल्या आज्जी ने उचलून घेतलं चार पाच मुके घेतले तेव्हा आज्जीला बर वाटल म्हातारी माणस नातवंडं बघून खुप आनंदी होतात एक वेगळाच मोह असतो.


बाबा, सासरे बुवा, रंजना आणि नियती जेवायला बसले जेवून झालं की सर्व गप्पा मारत बसले नियती ची बागेत खेळायची वेळ होती तिचे खेळ चालूच होते या घरातून त्या घरात हे समान काढ ते समान काढ नियती ला बाबा ओरडले काय ग कशाला समान काढतेस परत आणणार नाही तुला इकडे आणि कुठे नेणार सुद्धा नाही नियती रागात वरच्या खोलीत गेली तिथे गौरव बसला होता मोबाईलमध्ये अश्लील विडिओ बघत नियतीने आवाज दिला मामा... मी इथे खेळू का???? त्याने उत्तर दिले हो खेळ गौरव चा फाजिल पणा सुरूच होता तो एकटक विडिओ बघत होता तर एकटक नियतीला पाहत होता कुठे तरी त्याच्या मनातली काम वासना त्याला उनवत होती काही वेळा नंतर त्याने नियतीला जवळ बोलावलं आणि मांडीवर बसायला सांगितलं नियती लहान तिला काहीच कल्पना नव्हती की मामा च्या मनात काही वाईट असेल ती मांडीवर बसली तरीही गौरव विडिओ बघत होता नियतीला त्यातले काही कळले नाही ती तिच्या बाहुल्यांच्या सोबत खेळण्यात मग्न होती गौरवची कामवासना वाढली त्याने नियतीसोबत नराधम होऊन तिची अभ्रू हिरावून घेतली होती नियतीला काही कळेनासे झाले असह्य वेदनांनी थरकाप उडाला ती रडू लागली गौरवने तिचे कपडे नीट करून खाली जाण्यास सांगितले आणि धमकी दिली जर ह्या बद्दल आई बाबांना काही सांगितलं तर मी तुला संपवून टाकेन. नियतीला चालता येत नव्हतं, डोळ्यातील अश्रू पुसत ती खाली गेली रंजनाने विचारलं काय झालं बाळा रडतेस का? नियतीने नकारार्थी मान डोलावली तिच्या मनात भीती होती त्या रात्री ते सर्व घरी परतले पण नियतीच्या सोबत घडलेली ती घटना तिच्या डोळ्या समोरून जात नव्हती. आजवर ती ज्या व्यक्तीला मामा मामा करून त्याच्या खांद्यावर खेळली आज त्याच मामाने तिचा घात केला होता आणि नियती इतकी लहान होती की कुणाला काही समजून सांगू शकत नव्हती सहा वर्षाची पोर ती सांगेल तरी काय तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगबद्दल आठवूनसुद्धा अंगावर शहारे येत होते.

दुसऱ्या दिवशी नियतीला ताप आला तिची अंतर्वस्त्र काढताना रंजनाने पाहिलं की गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता. तिने नियतीला जवळ घेतलं तर तिला खूप ताप आला होता. तिला मूत्रविसर्जन करताना असह्य वेदना होत होत्या रंजनाला काही कळेना. पण तिला कळून चुकले होते की नियतीच्या सोबत काहीतरी चुकीचे घडले होते पण नक्की असे करणारं कोण तिने नियतीला खूप वेळा विचारले पण नियतीने कधी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. सर्वांना असेच वाटले की खेळताना काहीतरी लागले असेल पण तो सर्वांचा भ्रम होता डॉक्टर सुद्धा स्पष्ट करू शकले नाही कारण त्यांनी फक्त वरवरून तपासणी केली होती. असेच काही दिवस लोटत गेले आता नियतीला लैंगिक शिक्षणामुळे सर्व कळून चुकले होते की तिच्यासोबत जे घडले होते तो बलात्कार होता आणि समाजात बलात्कार झालेल्या स्त्रियांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं हे तिला कळून चुकलं होत म्हणून सर्व कळत असतानासुद्धा तिने कधीच या गोष्टीचा उलगडा नाही केला.

असेच दिवस लोटत गेले आता नियती वयात आली होती तिला एका मुलाबरोबर शिकत असताना प्रेम झाले काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु नियतीच्या मनात आजही तीच भीती होती की माझ्या सोबत घडलेली गोष्ट जर समाजात कळली तर माझ्यासोबत माझ्या आई वडिलांची समाजात असणारी संपूर्ण मानमर्यादा मातीमोल होईल म्हणून ती चुपचाप विषाचा घोट घेत होती. तिच्या मनात तिच्या असणाऱ्या मामाबद्दल तिरस्कार भरला होता आज तो मरण पावला होता पण तिला काडीमात्र फरक पडला नाही कारण ज्या व्यक्तीने एखाद्या मुलीच्या आयुष्यच उध्वस्त केलं असेल त्याला नक्कीच मरण यायला हवं. नियतीचे प्रेम खूपच वाढलं होतं पण तिला तिच्या आयुष्याची सुरुवात करायची होती पण पुरुषांची मानसिकता असते की जर मुलीमध्ये कौमार्य नसेल तर ती पवित्र नाही असा काहीसा भ्रम संपूर्ण भारतात आहे आपल्याला चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे लग्नानंतर नियतीच्या आयुष्यात वादळ येऊ नये म्हणून तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगावंसं वाटलं परंतु नियतीच्या मनात शंकांचं उधाण आल होतं जर हे ऐकून त्यांनी मला सोडून दिल तर काय होईल? माझं प्रेम खर आहे परंतु... जस समाज पीडितेकडे पाहतो तसं पाहायला सुरुवात केली तर सर्व संपून जाईल?

अखेर नियतीने निर्णय घेतला होणाऱ्या पतीला संपूर्ण हकीकत सांगण्याचा पावसाळ्याचे दिवस होते तेवढ्या पावसात नियतीने होणाऱ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं अत्यंत महत्त्वाचे बोलायचं आहे येऊन भेटा... तिचा होणारा पती येऊन उभा होता १५ मिनिटे झाली पण नियतीच्या मुखातून शब्द निघेना ती घाबरली होती तिला तो प्रसंग डोळ्यासमोर येऊन ठेपला होता सांगू तरी कसं डोळ्यातून अश्रुधारा चालू झाल्या त्याला नक्की कळल नाही त्याने विचारलं नियती काय झालं? नियतीने नकारात्मक मान डोलावली पण अश्रू थांबत नव्हते त्याने तिला मिठीत घेऊन दोन्ही डोळ्यातील अश्रू पुसत विचारलं काय झालं सांगशील का? मी सांगेन पण तुम्ही आधी वचन द्या की मी जे सांगीन ते ऐकल्यावर मला सोडून जाणार नाही? तो सुद्धा क्षणभर गांगरला त्याला ऐकायचं होत नक्की कशामुळे नियती रडत आहे त्याने वचन दिले नाही जाणार! कधीच नाही जाणार श्वास असेपर्यंत साथ देईन असे बोलून तिच्या कपाळावर चुंबन घेतलं नियतीने हुंदका फोडत सुरुवात केली आणि घडलेला लहानपणीचा प्रसंग त्याला सांगून टाकला. मागील २० वर्षात नियती कुणालाच या प्रसंगाबद्दल सांगितले नव्हते तो आश्चर्यचकित झाला आणि नियतीला धीर देत म्हणाला अगं यात तुझी कुठे चूक होती का? त्या नराधमाच्या वासनेमुळे तुझे आयुष्य उध्वस्त झाले तू झेललेल्या असह्य वेदना त्यांना तू समोर गेलीस एवढं सगळं तू एकटीने सहन केलंस मग तुला अस का वाटलं की हे ऐकून मी तुझी साथ सोडून देईन जर हीच गोष्ट माझ्यासोबत घडली असती तर तू सुद्धा मला अर्ध्यावर टाकून गेली असतीस का? तिने नकारार्थी मान डोलावली आणि त्याला घट्ट मिठी मारली.


लवकरच दोघांचं लग्न झालं आणि त्यांनासुद्धा एक सुंदर गोड गोंडस मुलगी झाली तिचं नाव एलिझाबेथ ठेवलं आहे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे लहानपणापासून तिला लैंगिक शिक्षण देत आहेत. सध्या मुली स्वतःच्या घरातच सुरक्षित नाहीत आणि त्यांच्यावर अत्याचार करणारे दुसरे कुणी नसून त्यांचे नातेवाईकच असतात म्हणून मुलांना लहान वयातच शिक्षण द्या. चांगला स्पर्श वाईट स्पर्श यातला फरक समजवा आणि लहान मुलींना किंवा मुलांना एकटे सोडू नका, नजरेआड होऊ देऊ नका. सर्वांनी काळजी घ्या. समाजात बरेच नराधम मोकाट आहेत. वेळेचा फायदा घेण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पीडित महिला ही स्वतःहून पीडित नसते समाजातील नराधम तिला पीडित बनवतात, ती शिकार होते समाजातील प्रत्येक पुरुषांच्या वाईट नजरेची. घरातून बाहेर पडली की तिला सतत स्वतःला सावरत राहावं लागतं आणि जर कधी नकळत शरीराचा एखादा भाग दिसला तर तिच्यावर वाईट संस्कार झालेत असा शिक्का मारला जातो. सर्वांनी आपापल्या परिवाराची काळजी घ्या. स्त्रियांना समजून घ्या, त्यांना आपलंसं करा, प्रेम द्या, तेव्हा प्रेम मिळेल...


©मितेश कदम


निसर्ग

चिमण्यांची चिवचिवाट
पाखरांची किलबिलाट

मंद वाहणारा वारा
झुळणारी झुडपे

निरभ्र निळसर आकाश
ते निळसर पाणी

सांयकाळचा मावळणारा सुर्य
रात्रीचा उगवणारा चंद्र

चांदण्याची लखलखाट
रात किड्यांची किर किर


©मितेश कदम


दहावीच वर्ष.....

आज दहावीच्या शिकवणीला सुरुवात झाली. दहावी म्हणजे सुट्ट्या कमी आणि अभ्यास जास्त असतो नववी ला होतो तर सगळे म्हणायचे हे खुप महत्त्वाचे वर्ष आहे हे निघालं की दहावी चे वर्ष अगदी सुरळीत जाते आणि दहावी ला कसाबसा आलो तर हे वर्ष आयुष्याची पहिली पायरी आहे असं सांगण्यात आलं हे वर्ष काढलं की बारावी उत्तम रित्या निघेल अस सांगण्यात येत आता खर काय नि खोटं काय परंतु शिक्षण ही काळजी गरज आहे हे तेवढं खर आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण घेतलं की हक्काची भाकर नेहमी मिळवू शकतो पण तशी साथ मिळाली की नक्कीच यशाचे शिखर गाठता येत यात गैर नाही.
नेहमी प्रमाणे शाळेत गेलो पण नवीन वर्गात गेलो की खोली बदलली असते पण मागचे संपूर्ण वर्ष त्या खोलीत घालवलेल्या आठवणी डोळ्या समोर असतात आणि खोली बदलण्याची इच्छा नसते पण नियम सर्वाना असतात मी खालीच वाट बघत होतो कुणी ओळखीचं दिसत का ????
आणि नेमका माझं नाव कानी पडलं .....

ए गण्या.........???????  दिनू ने हाक दिली
दिनू ......माझा  जिवलग मित्र माझीच वाट बघत होता त्याने तिसऱ्या मजल्यावरून आवाज दिला 
इथे वर वर बघ मी शोध घेत होतो आवाज कुठून येत आहे
तिसऱ्या मजल्यावरून दिनू आवाज देत होता मी तडक निघाली पायऱ्या कापत हापत हापत वर पोचलो 
भावा!!!!! कसा आहेस????
दिनू ने उत्तर दिले कसा दिसतोय मी ?????
कडक!!!!! मी उत्तर दिले....

नेहमी प्रमाणे शेवटचा बाक आमचा ठरलेलाच म्हणजे शिक्का मोर्तब केला होता आणि शाळेत असेच नियम असतात सभ्य मुलं पहिल्या बाकावर आणि आम्ही वळू शेवटच्या बाकावर 😉

शाळेचा पहिला क्लास वर्ग शिक्षकांचा बाकावर बसलेल्या मुलांच्या कडे बघत कुणी आल नाही याचे निरीक्षण करत वर्ग शिक्षिका बघत होत्या माझ्या कडे लक्ष देत म्हणाल्या
आलास का रे बाबा......??????
हो बाई तुम्हाला एकट टाकून कस जमेल.........
३ वर्ष झाले बाईंना सर्व मुलांचे स्वभाव चांगलेच परिचयाचे झाले होते त्यामुळे उलट उत्तर देणे हा मागील बाकावर बसलेल्या मुलांचा जन्मसिद्ध हक्कच जणू काही

हजेरी घेण्यासाठी बाई उठल्या पण त्या आधी नवीन वर्षाचे भाषण दरवर्षी प्रमाणे बाईंनी ऐकवायला सुरुवात केली आणि नाविनवर्षं आणि नवीन अटी आणि शर्ती सांगण्यास सुरुवात केली.....
दहावीचे वर्ष हे आयुष्याची पहिली पायरी असत त्यामुळे प्रत्येक मुलाने आपले भविष्य काय ठरवले आहे त्यावर अवलंबून आहे जेवढा जास्त अभ्यास करेल तोच यशाची किल्ली गाठेल हे आमच्या बाईंच नेहमीच वाक्य होत आणि जो विद्यार्थी उशिरा वर्गात येईल त्याला खाली बसवण्यात येईल वर्गपाठ आणि गृहपाठ नित्य नियमाने करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाईल अशी आशा दाखवली जायची दर वर्षी पण बक्षीस काही मिळाले नाही कोणत्याही विद्यार्थ्यांना पण तरीही मुलींची स्पर्धा सुरू होत सर्व तयारीला लागायचे  आणि आमचे शेवटचे दोन बाक हे नेहमी प्रमाणे शिक्षकांची टिंगल करण्यात अग्रेसर होते पण जेव्हा अभ्यास सुरू असेल तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यास हा आमचा सर्वांचा नियम

भाषण संपून सर्व शिक्षकांच्या पहिल्या दिवसाचा आरंभ झाला शाळेची घंटा झाली सर्व घराकडे निघाले मी दरवर्षी प्रमाणे सायकल वर शाळेत जात होतो या वर्षी दिनू च्या बाबांनी त्याला शाळेत जाण्यासाठी सायकल घेऊन दिली होती दिनू माझ्या शेजारच्या गावी रहात होता त्यामुळे घरी जाताना आम्ही दोघे सोबतच घरी निघायचो

घरी जाताना चर्चा रंगली अरे ती संजू किती फुगली बघितलिस का तू???? दिनू ने प्रश्न विचारला
हो रे !!!!! पण सुंदर दिसत होती आधी पेक्षा आज छान गजरा आणि गुलाबाचे फुल वेणी मध्ये कोंबून आली होती मी उत्तर दिले
अरे कोंबून नाही रे वेड्या!!!!!!!!दिनू मध्येच म्हणाला
त्याला मळणे अस म्हणतात 

मुलींना जन्मापासून सुंदर दिसण्याचा आजार असतो चेहरा काळा जरी असला तरी आरसा जणू काही त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यांना बाकी कुणी दिसत नाही त्या आरश्या शिवाय एकट्याच आरश्या समोर बसून केस कुरवाळत असतात
@संजू माझं आणि वर्गातील प्रत्येक मुलाचं पहिलं प्रेमच जणू काही!!!
दिसायला गोरी गोरी पान , खाकी पावडर सुद्धा फिक्की दिसेल तिच्या समोर अस काही रूप तीच, मन मोहक असे डोळे थोडे निळसर कुणीही बघून प्रेमात पडेल नेहमी केसात गुलाबाचे फुल किंवा रात-राणीच्या फुलांचा0 गजरा मळून संपुर्ण वर्गात त्याचा सुगंध दरवळत असायचा वर्गात प्रवेश करताना जर नाकाला त्याचा सुगंध आला की समजून जायचं वर्गाची परी राणी अवतरली आहे तिला डोळेभरून बघण्याची ओढ असायची
तिच्या गजऱ्याचा एक वेगळा अर्थ सुद्धा होता तो काही सांगता येणार नाही मंडळी.... पण तुम्ही तो मला कळवू शकता
उत्तराची प्रतीक्षा असेल मला???

दहावीच्या वर्गात असताना घरी अभ्यास करता येत नसे सतत काहीतरी अडचण येत असायची माझी बुद्धी जशी बुरशी लागलेली तिचा कधी वापर झालाच नाही सगळं डोक्यावरून जात असायचं मग बाबांनी शिकवणी लावली शिकवणीचा खर्च उचलण्याइतपत आम्ही काही श्रीमंत नाही बाबा पिठाच्या गिरणीवर काम करायचे तेव्हा दोन आणे शेर पीठ मिळायचे आणि शिकवणी ची फी दोन रुपये इतकी आणि शिकवणी चे गुरुजी एकदम हिटलर सारखे त्यांना बघूनच सर्व मुलं घाबरून जायची दिसायला अगदी खुंखार रात्रीच्या स्वप्नात जरी आले तर सकाळी अंथरून ओल ओल झालेलं असायचं एक वेगळीच दहशत होती त्यांच्या आवाजात आणि शिकवणीला जाण्याची इच्छा नसायची पण योगा योगाने संजू सुद्धा तिथेच शिकवणी घेण्यासाठी येत असे.

शालेय शिक्षणात मी फारसा काही हुशार नव्हतो आणि चित्रलेत तर अगदीच भोपळा घेऊन येत आणि चित्रकलेचे गुरुजींनी मला भोपळा नावच ठेवले होते पण माझा मित्र दिनू नेहमी माझी समजूत काढायचा आणि माझं कौतुक करायचा मी नापास जरी झालो तरी दिनू मला हसवायचा आणि म्हणायचा अरे मी आहे ना तुझ्या जोडीला कशाला घाबरतो आणि खर म्हणजे हा दिनू खुप लबाड होता याने मला एकदा येऊन सांगितले की संजूला तू खुप आवडतोस आणि संजूला जाऊन सांगितले की गण्या ला तू खूप आवडते म्हणजे  दोघांच्या रेल्वे सुरू करून दिल्या दिनू ने पण आम्ही कधी हिम्मतच केली नाही एकमेकांना आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची आम्ही दिवस भर एकमेकांना डोळे भरून बघत असायचो कधी ती मला गपचूप बघत असायची आणि मी फळ्याकडे बघत गुरुजींना त्रास देत असायचो आणि कधी मी तिच्या कडे एकटक बघत असायचो जेव्हा तिला कळायचे तेव्हा एक झलक देत गोड असे स्मित हास्य करायची नकळत हळू हळू संपुर्ण वर्गातील मुलांना ही बातमी समजली पण शाळेतली मुलं शेवटी कधी सुधरणार्यातली नसतात हे माहीतच आहे त्यांनी लगेचच मला संजू च्या नावाने चिडवायला सुरुवात केली आणि संजू ला माझ्या नावाने त्यांना एक भलताच आनंद मिळत असावा पण मला ते सहन होत नव्हते माझा राग आवाक्याबाहेर जाऊ लागला आणि प्रेम वैगेरे काही नसतं फक्त आकर्षण असत हे स्वतःलाच समजावू लागलो परीक्षा तोंडावर होती आणि माझं लक्ष विचलित होत होते आणि त्याच काळात संजूने तिच्या प्रेमाचे पत्र आणून दिले मला काही कळेना संजू चांगल्या घरातली आणि मी मध्यम वर्गातील सुद्धा नाही मी तिच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार संपुर्ण आयुष्य कस काढणार या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर सापडलं की या सर्व गोष्टीला कुठे तरी आळा बसला पाहिजे मी ते पत्र न वाचताच संजू ला परत दिल आणि तिला समजावून सांगितलं आयुष्य खुप मोठ आहे क्षणिक आकर्षणाने आयुष्य खर्ची जाऊ नये म्हणून योग्य वेळेतच मार्ग बदलायला हवा आणि तो माझा आणि संजू च्या आयुष्यातील शेवटचा दिवस निघाला त्यानंतर संजू ने मला तिचा चेहरा कधी दाखवला नाही आणि मी सुद्धा तिचा चेहरा बघण्यासाठी कधी गेलो नाही हृदयात तिच्यासाठी खुप भावना होत्या पण त्यांचा नाईलाजाने अंत करावा लागला कदाचित तो चांगल्यासाठी सुद्धा असेल हरकत नाही 
जर आपल्या एखाद्या निर्णयाने समोरच्या व्यक्तीचे नुकसान टळत असेल तर तो निर्णय घेण्यात हरकत नाही आणि आपण सुद्धा कधी स्वार्थी विचार करू नये अशी माझी भावना आहे

लवकरच दहावीच्या परीक्षा कालावधी सुरू झाला मी अजून सुद्धा संजूच्या विचारातून बाहेर निघालो नाही मी तिला शरीराने लांब तर केले परंतु तिचे विचार अजूनही डोक्यात घर करून होते दिवस रात्र नजरे समोर तीच तीच आणि फक्त तीच त्या मुळे अभ्यासात काही लक्ष लागेना आणि अखेर परीक्षा सुरुवात झाली आणि योगा योगाने दिनू माझ्या पुढील बाकावर आला मला वाटलं जणू देव माझ्यावर प्रसन्न झालाच असावा पण त्या दिवशी मला दिनू चा खरा चेहरा जाणवला
मराठी चा पपेर आणि मानसिक त्रासाने वाचन काही लक्षात राहील नाही आणि प्रत्येक परीक्षेत असा एकही विद्यार्थी नसेल की त्याने रिकाम्या जागा स्वतः पाठ करून लिहल्या असतील रिकाम्या जागा विचारूनच लिहतात बहुतेक त्यातील मी सुद्धा एक
मी दिनू ला विचारलं दिनू उत्तरे सांग ना ?????
जर मी तुला उत्तरे सांगितली तर तू माझ्या पुढे जाशील आणि मला ते कदापि सहन होणार नाही स्वतः चा अभ्यास स्वतः कर आणि उत्तरे लिहून पास हो !!!!! दिनू ने उत्तर दिलं
मला हे उत्तर ऐकून जरा धक्काच बसला माझा जिवलग मित्र मला अशी उत्तरे देतो म्हणजे नक्कीच मी माणसे ओळखण्यात कुठे तरी चुकतो
त्यानंतर संपूर्ण परीक्षेत दिनू सोबत एकदाही बोलणे झाले नाही आणि दिनू ने दहावीच्या परीक्षेत ८०% मार्क मिळवले पण मी कुठे तरी कमी पडलो भरकटलो आणि ३९% मार्क घेऊन निराशेने घरी आलो तेव्हा मला कळून चुकले की.......

आयुष्यात आपले लक्ष विचलित करणारे खुप क्षण येतात आणि आपण त्यांच्या सोबत भरकटले जातो त्यामुळे आपल्या शैक्षणिक आणि पारिवारिक जीवनावर त्याचा ठसा उमटला जातो जो कधीही पुसता येणार नाही जणू असा काही आणि त्यामुळेच एकच ब्रीद वाक्य लक्षात ठेवावे ""एकटाजीव, सदाशिव""


©मितेश कदम

प्रिय शिरीन....

प्रिय, शिरीन. विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???" प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत न...