गुरुवार, १६ जुलै, २०२०

प्रिय शिरीन....



प्रिय,
शिरीन.
विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???"

प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत नाही. पण यामुळे माझं प्रेम काही कमी झालं नाही आणि होणार ही नाही. मी आईला आणि बाबांची परवानगी मागितली आहे, आपल्या लग्ना बद्दल पण अजूनही त्यांनी होकार दिलेला नाही आहे. आज पुन्हा मी घरातील सर्व वरिष्ठ मंडळी सोबत माझ्या लग्नाचा विषय काढणार आहे. मला तुझ्या कडून शेवटचं उत्तर हवं आहे, की तू लग्नासाठी तयार आहेस की नाही.

शिरीन तुला आठवत असेल आपण काढलेले ते फोटो त्या मध्ये आपल्या मागील आठवणीतले फोटो बघत बसलो होतो. तुझ्या चेहऱ्यावरील ते हास्य आजही तसच डोळ्यात भरलेलं आहे. मला तुझ्या पासुन लांब जायचं नाही आहे. तु माझ्यासाठी तुझं घर सोडून येशील त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःच्या घराची तयारी करावी लागेल. त्यामुळे मी ज्यादा काम करत आहे जेणेकरून पैसे जमवून आपण स्वतः एक घर घेऊया ज्यामध्ये तु आणि मी आपलं सर्वस्वी जग असेल. मला कळत नाही की मी योग्य निर्णय घेत आहे की नाही कारण शिरीन मला तुझ्यापासून वेगळं होता येणार नाही. तुझ्या शिवाय आयुष्याच्या वाटेवर मी एकटा प्रवास करू शकत नाही कारण माझ्या जगण्याचं ध्येय तुच आहेस. पण मी माझ्या आई वडिलांना वृद्धापकाळात एकट्याला जगण्यासाठी सोडू शकत नाही माझ्याच नाही तर तुझ्या आई बाबांच्या साठी माझ्या मनात तितकाच आदर आणि प्रेम आहे. आणि जेव्हा त्यांना आपली गरज असेल तेव्हा आपण त्यांच्या सोबत नसणार हे योग्य वाटत नाही. म्हणुन तु तुझ्या आई वडिलांना माझ्या बद्दल कळव मी माझ्या आई वडिलांना तुझ्याबद्दल कळवतो.लवकरच उत्तर येईल अशी अपेक्षा करतो.

शिरीन आज पुन्हा तु दिलेल्या पत्रांच्या ढिगाऱ्यात पाहिले पत्र सापडले ती तारीख तो वार आणि तो क्षण जशास तसा डोळ्यासमोर उभा राहिला. तुला आठवत असेल कसा मी रेल्वे स्थानकावर तुझी वाट बघत उभा होतो. तुला पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झाले होते. तु एक एक पायरी चढत येताना माझ्या हृदयाच्या ठोक्यानी जोर धरला होता. तु हळू हळू वर चढत येत होतीस, परंतु माझं हृदय त्याच्या चार पटीने जोरात धडकत होत. आजही तो अनुभव वेगळाच वाटतो. तुझ्या चेहऱ्यावर एक तेज होत. कदाचित ते मला पाहण्यासाठी असावं. त्यानंतर ट्रेन मध्ये तुझा हात हातात घेऊन चढताना आपलेपण वाटत होतं. ते सतत अनुभवावस वाटत. तुझं ते नाक मुरडन आजही आठवलं की चेहऱ्यावर खुदकन हसु येत. तुझ्या आणि माझ्या उंचीतील फरक जेव्हा तु मला दाखवत आणि माझ्या कडे वर तोंड करून बघत असायची तो क्षण मी माझ्या डोळ्यात भरून ठेवला आहे आणि कायमस्वरूपी तो माझ्या मनावर उमटून राहील. शिरीन आता हा दुरावा सहन होत नाही मला तुझ्या मिठीत मारायचं आहे.

आज पुन्हा त्या आठवणी जिवंत झाल्या. लवकरच तुला भेटायला येईन. तुझी खुशाली कळव. तु काळजी घे स्वतःची वेळेवर जेवत जा. आई बाबांना माझा नमस्कार कळव.

फक्त तुझा,
-मितेश


बुधवार, १५ जुलै, २०२०

तु आलास की...




तु आलास की ।
दरवळतो तो मातीचा सुगंध।।

तु आलास की ।
बहरतात झाडे झुडपे।।

तु आलास की ।।
घेतो सुटकेचा श्वास।।

तु आलास की ।
भिरभिरते किलबिलाट पाखरांची ।।

तु आलास की ।
लागते चाहूल गारव्याची।।

तु आलास की ।
धन्य होतो माझा राजा शेतकरी।।

तु आलास की।
मेघ गरजतात छान ।।

तु आलास की ।
भागते तहान आणि नदी नाले छान।।


तु आलास की ।
आगमनाची आतुरता लागते बाप्पाची।।

तु आलास की ।
तु आलास की ।।



सोमवार, ६ जुलै, २०२०

अर्धवट....



पहिल्यांदा पाहताच कुणी प्रेमात पडत का??
हा प्रश्न मी नेहमी स्वतःला विचारत असतो आणि त्याच उत्तर नकळत कधी सापडत सुद्धा नाही.
 कारण मला माहीत आहे मी प्रेमात पडलो होतो.
कामावरती पहिला दिवस नेहमी सारखाच घरातून डब्बा घेतला आणि चालत निघालो आणि कंपनीच्या दारावर सुंदर देखणी ती उभी होती. कुणाची तरी वाट बघत असावी. आणि नेहमी प्रमाणे मी गेट मधून आत जाण्या आधीच तिने आवाज दिला.
अहो!!!!!! तिने आवाज दिला
माझ्या मनात कॅडबरी चे दोन्ही लाडू एकत्रच फुटले.
नकळत गुलाबाचं फुल उमगलं. कदाचित क्षणिक असेल पण तो क्षण मनाला मोहनारा होता.
मी उत्तर दिलं "बोला"!!!
"आज माझा कामावर पहिला दिवस आहे आणि आत कशी जाऊ हे काही कळत नाही 
भीतीने हात पाय गार पडलेत तुम्ही मला आत पर्यंत सोबत याल का"??? तिने मला विचारलं
हे वाक्य ऐकून मी स्वप्नात तर नाही ना असा भ्रम पडला सकाळी उठून अंघोळ तर केली होती पण स्वप्नात सुद्धा एवढा भयंकर प्रसंग कधी घडला नव्हता.
मी मिलिंद स्टोर मॅनेजर आहे. इथे "मी" ओळख करून दिली.
मी प्राजक्ता रिसेप्शन डेस्क साठी आले आहे.
तिला बघताच मी तिच्या प्रेमात पडावं हा मोह आवरेना मला.
तीच शब्दात वर्णन करण्यायोग्य ती नाहीच मुळी, 
गोरी गोरी पान, हिरव्या पैठणीच्या कापडाने शिवलेला चुडीदार ड्रेस, कानात घंटी असलेले लांब कानातले, उजव्या हाताला अडकवलेली नवीन कोरी पर्स, डाव्या हातात प्लास्टिक ची पिढवी पोटाला धरून, माथ्यावर लाल गंध, आणि मखमली ओठावर साजेल अशी लिपस्टिक, आणि कोवळ्या कोवळ्या पायात नवीन अशी सँडल. अश्या रुपात कोण भुलणार नाही सांगा.
मी तर पाहता क्षणीच भुललो. 
ओळख झाल्यानंतर प्राजक्ताला विचारलं इथं पर्यंत कसे आलात???
"बाबा सोडून गेले" तिने उत्तर दिलं.

कंपनीतल्या दोन चार मुलींच्या सोबत तिची ओळख करून दिल्या नंतर प्राजक्ताचा एकटेपणा कमी वाटू लागला. पण माझा आणि तिचा जेवायला जायचं वेळ ठरलेला असायचा आधी मी एकटा जेवायला जायचो पण जेव्हा पासून प्राजक्ता माझ्या आयुष्यात आली आणि माझं उभं आयुष्य बदलून टाकलं.
दुपारी दोन च्या सुमारास दररोज एकत्र जेवायची सवय एक दिवस मी डब्बा नाही आणला आणि जेवायला जायची इच्छा नसल्याने कामात गुंतून राहिलो. तिने १० मिनीटे वाट बघिल्यानंतर मला शोधत शोधत माझ्या स्टोर पर्यंत येऊन पोहचली. 
मी तिला बघताच शब्द निघेनासे झाले.
चला जेवायला मी केव्हाची वाट बघत बसले तिकडे???? प्राजक्ताने कठोर आवाजात विचारलं.
मला काही उत्तर सुचल नाही.
डब्बा नाही आणला मी!!!
चला मी आणलाय आपण जेऊया. अस म्हणून माझ्या हाताला धरून तिने मला ओढत कँटीन मध्ये घेऊन गेली.

पुरण पोळ्या आणल्या होत्या माझ्यासाठी आणि मी आज डब्बा आणायला विसरलो होतो.
संपूर्ण कंपनी मध्ये चर्चा रंगली होती आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि त्या चर्चे मधला सार मला आवडत होता. मला प्राजक्ता आवडत होती. मला तिने जगण्याची उमेद दाखवली होती. आयुष्यात कुणासाठी तरी जगावं अशी ती होती.
तिच्या सोबत जगताना आपल्या आयुष्यात दुःख नाहीच असा भास होत असायचा पण कदाचित क्षणिक असावा.
मला पुरण पोळ्या चारत असताना तिने विषय काढला.
आई बाबानी माझ्या साठी मुलगा बघितला आहे. सॉफ्टवेअर कंपनी मध्ये कामाला आहे ५०-६० हजार रुपये पगार आहे. आणि मला सुद्धा तो आवडतो. तू माझा जिवलग मित्र आहेस मला काही सुचेनासे झाले आहे.

पुरण पोळीचा अर्धा घास तोंडात आणि अर्धा घास हातात. तिच्या चेहऱ्यावर जराशी पण चिंता दिसत नव्हती पण माझ्या चेहर्यावर बारा मात्र नक्की वाजले होते. तिने एवढा मोठा निर्णय मला सांगण्यामागचं कारण काय असाव हे मी जाणून घेण्याआधीच निथुन निघालो.
दुसऱ्या दिवशी सुट्टी होती विचार केला की सोमवारी भेटून तिला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगून टाकेन कारण वेळ हातात होती.
सोमवारी कंपनीच्या दरवाज्यावर वाट पाहिली पण प्राजक्ता काही आली नाही.
मला वाटलं लग्न ठरलं म्हणून तिने कदाचित नोकरी सोडली असावी म्हणून मी पण तिला विसरण्याच्या मार्गावर निघालो . पण राहून राहून तिने दिलेल्या प्रेमळ आठवणी सतत डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या म्हणून कंपनीच्या क्लर्क ला सांगून पत्ता मिळवला. 
उद्या सुट्टी घेऊन तिच्या घरी जायचं ठरलं. सकाळी नित्यनेमाने कार्यक्रम पार पाडून निघालो. 
तिच्या दारात मांडव घातला होता.  वाटलं लग्नासाठी घातला असावा. मनात हूर हूर वाढत होती पाऊले जड होत होती तरीही तिच्या दाराजवळ पोहोचलो. पण तिथे वेगळंच दृश्य होत. कुणाच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. मी एका काकुला विचारलं काय झालं इथे???.
काकूने उत्तर दिलं 
प्राजक्ता गेली!!!!!!!!!!
माझ्या पायाखालची जमीन हादरली. डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी खाली कोसळलो. तिच्या बाबांनी घरातून पाणी भरून तांब्या आणला आणि माझ्या डोळ्यातील अश्रुधारा सुरू झाल्या. मी काय बोलू आणि कशी सुरुवात करू मला काही सुचेना.
तिच्या बाबांना विचारलं नक्की त्रास काय होता तिला???
त्यांनी उत्तर दिलं "कंपनीत एका मुलावर प्रेम होतं तिचं"
बस एवढं ऐकून कान शांत पडले.



©-मितेश

शनिवार, ४ जुलै, २०२०

स्वप्न नगरीचा राजा

स्वप्न नगरीचा राजा



"चल चल आवर पटा पट" !!!! - स्वराताई...
काय झाल? झोपू देना मला !!!! - नितीन...
अरे दादा उठ बाबा बघ काय करत आहेत .

बाबानी सगळं समान इकडे तिकडे पसारा मांडला होता. मला नक्की कळत नव्हतं काय चालू आहे. ते मी डोळे चोळत अंथुरणात बसलो, बाबांना बघत नक्की करत काय आहेत बाबा???

मी नितीन वय वर्ष ७ इयत्ता २ री (ब) जिल्हा परिषद शाळेत शिकतो. स्वराताई माझी मोठी बहीण इयत्ता ५ वी मध्ये शिकते माझ्याच शाळेत आणि विठ्ठल माझे बाबा महार गावात कुठं जनावर मृत पावल किंवा कुठ गटार तुंबली की गावकरी बाबांना प्राधान्य द्यायचे
" फाटक पिवळे धोतर आणि मळकटुन मातीच्या रंगाचा सदरा, पायात चप्पल नावाची गोष्ट कधी मिळाली नाही, टाचांना भल्या मोठ्या मोठ्या चिरा पडलेल्या आणि सतत कुणाकडे तरी काहीतरी काम मिळेल अशी आशा ठेवणारे माझे बाबा".
 अस आमचे तिघा जणांचे कुटुंब आई काळाच्या ओघात केव्हा निघून गेली काही कल्पना नाही कधी गेली कशी गेली कुठे गेली पण बाबा दररोज सांगतात 
"आभाळात ती चांदणी दिसते का? जी खुप जास्त लखलखते तीच तुझी आई कायम तुला बघत असते-(बाबा बोलत होते)”
बाबा!!! 
आई रात्र झाली का दिसते?
 दिवस भर मला बघायला सुद्धा येत नाही मी एकटाच असतो दिवस भर माझ्यासोबत कुणी बोलत सुद्धा नाही स्वराताई पण तिच्या मैत्रिणींच्या सोबत खेळत असते मला खेळायला कुणी घेत सुद्धा नाही.

काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे, आणि या वर्षी मी बाबांना सांगणार आहे, आपल्या घरी बाप्पा घेऊन या म्हणून पण बाप्पा ला आणले की, 
बसवायचे कुठे मी एकटाच विचार करत होतो!!.
"नारळाच्या झावळ्यानी बनवलेलं जेमतेम १० X १० च माझं घर असावं आणि त्यात शेणाने सारवलेल".
 घरात एकही टेबल नाही घरात देव्हारा नाही एक छायाचित्र खराब झालेला फोटो होता, त्यात कोणते देव होते हेही कळत नव्हते पाण्याने त्यातील चित्र पुसट झाले होते मी बाबांना नेहमी म्हणायचो बाबा हे कोणते देव बाप्पा आहेत. तेव्हा बाबा उत्तर द्यायचे हे "गणपती बाप्पा" आहेत.
आता गणपती बाप्पा कोण हे कुणाला माहीत नसावेत लहानपणापासून प्रत्येकाला माहीत असत गणपती बाप्पा कोण आहेत. जेव्हा पण गणपती येतात तेव्हा असा काही जल्लोष प्रत्येक घरा घरा मध्ये असतो की सगळी कडे एक मन प्रसन्न करणार वातावरण निर्माण झालेलं असत. 
सगळीकडे सुगंधी अगरबत्तीचा सुगंध आणि गाण्यांच्या जल्लोषात सर्व गणेश जयंती साजरी करत असतात आणि या वर्षी मी सुद्धा बाबांना आग्रह करणार आणि गणपती बाप्पाला घरी घेऊन येणार 

मी-बाबा आपल्या घरी गणपती बाप्पा घेऊन या ना??????
मला बाप्पा बरोबर खेळायचं आहे!!!!
माया अक्का बोलते, बाप्पा ला घेऊन आला की बाप्पा ला सांग तू तुझ्या आईला बोलवून आणेल.

"स्वरा" माझी ताई आणि आई दोन्ही सकाळी उठल्यापासून मला कडपे घालून नाष्टा चारून डब्बा बनवून देऊन माझ्या शाळेत सोडे पर्यंत स्वराताई नुसती माझी "आई" झालेली असते. ताईने कधी मला आईची कमतरता भासू दिली नाही, पण शेजारील मुलांच्या आई बघून मला आई पाहिजे असायची. पण ताई मला तिच्या पोटच्या मुला सारखी सांभाळत होती ताईने कधीच मला रडवल नाही. पण जेव्हा केव्हा मी राडायचो तेव्हा ताई मला खुदकन हसवायची जस की तिला माझ्या प्रत्येक गोष्टीच गुपित ठाऊक होतं. 
बाबांना माहीत होतं आपला मुलगा हट्टी आहे.
बाबा घेऊन या ना बाप्पा ला…
स्वराताई बाबांना सांग ना मला बाप्पा पाहिजे!!! 
 म्हणून त्यांनी होकारार्थी मान डोलावली पण बाबांना माहीत होतं आपली परिस्थिती खुप बिकट त्यात गणपती येणार म्हटल्यावर खर्च आला खिशात जेमतेम ५ रुपये आणि पावसाने लावलेली छतावरून गळती अश्या गळती मध्ये बाप्पा कसे घेवून येणार, पण कदाचित बाबांची सुद्धा इच्छा होती की बाप्पा घेऊन यायचेच यावेळी.
 सकाळी सकाळी सरपंचाच्या माणसाने निरोप आणला "विठ्ठल!! चल सरपंचांनी बोलावलंय
सरपंचांनी २ रुपयांच्या बोलीवर बाबांना एक एकर शेतीत लावणी करिता बोलवलं पैसे कमी होते पण बाबांना सध्या पैसे पाहीजे होते दोन्ही मुलांच्या अपेक्षा २ रुपयांच्या साठी एक एकर शेती लावत होते आणि आम्ही दोघे आनंदाने भरून आलो होतो.
स्वराताई समजूतदार आणि हुशार होती तिला बाबांचं दुःख त्रास वेदना कळून येत होत्या दररोज बाबा एक वेळ जेवून आम्हाला दोन वेळ पुरेल अस वागत होते स्वरा ताई सतत माझी समजूत काढत असायची पण मी बालिश वृत्ती चा असल्यामुळे मला फारसे काही कळत नसायचे. 

लवकरच गणेश चतुर्थी जवळ येत होती. बाबानी संपूर्ण घरात शेण सावरले होते स्वरा ताईने बाबांना खुप मदत केली होती. पण अजूनही काही तयारी झाली नव्हती. बाबांना त्यांच्या समाजातील काही लोक आवडे लावत होते की महार गणपतीची पुजा करत नाहीत. पण बाबांनी सुद्धा हट्ट धरला होता यावेळी कितीही अडचणी आल्या तरी गणरायाचे आगमन करायचेच. 
शेवटी तो दिवस आलाच. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि मी  आणि स्वराताई घरीच होतो. बाबांनी स्वराताईला सांगितले की, मी गणरायाची मुर्ती आणायला जातोय आणि बाबा निघून गेले.

स्वराताईने प्रसादाची उत्तम सोय केली. शिरा बनवला होता आणि मी आतुर झालो होतो की बाबा कधी येतील. मी सतत स्वराताईला विचारत होतो, ताई बाबा कधी येतील???
स्वराताई सतत मला सांगत होती, नितु बाळा येतील बाबा लवकरच येतील.
मी आज नवीन शर्ट घातला होता. बाबांनी मागच्या वर्षी दिवाळीला घेतला होता आणि शाळेची चड्डी आणि पावडर लावून तयार होतो. पण बाबा काही येईना. सकाळची दुपार झाली. शिरा पुर्ण थंड झाला होता. मला भूक सुद्धा लागली होती पण स्वराताईने सांगितले होते की, जोवर बाप्पा येऊन जेवत नाही तोवर आपण उपास करायचा असतो. सात वर्षाच्या मुलाला उपास वैगेरे काय माहीत असणार???
इतक्यात
बाबा आले !!!
 बाबा आले !!! 
मी इतका खुश झालो की माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण बाबांच्या हातात मुर्ती काही दिसेना. बाबांच्या हातात एक चौकीनी वस्तू वर्तमानपत्रात गुंडाळून घेऊन येत होते.माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव तयार झाला होता. तेवढ्यात बाबा दारात आले. स्वराताईने बाबांच्या पायावर पाणी ओतले आणि त्यांना घरात घेतले. 

मी उड्या मारत होतो स्वरा ताई म्हटली अरे थांब थांब 
बाबा मुर्ती कुठे आहे???
 बाबा सांगा ना बाबा????
"अरे राजा, मुर्ती नाही मिळाली" बाबांनी उत्तर दिले
म्हणून मी गणरायाचे छायाचित्र आणलं आहे. आपल्या देव्हाऱ्यात जे बाप्पा आहेत ते खराब झाले आहेत ना म्हणून मग मी हे घेऊन आलो.
मी पूर्णपणे नाराज झालो होतो. सर्वांच्या घरात मोठं मोठया गणरायाच्या मुर्त्या पाहून मला वाटले बाबा सुद्धा एखादी मोठी मूर्ती घेऊन येतील. पण बाबांनी मला दिलेला शब्द पाडला नाही.
बाबांनी आणि मी अगदी मूर्तीची जशी  तशी त्या छायाचित्राची प्रतिष्ठापना केली. त्या नंतर आरती सुरू झाली की तेवढ्यात शेजारील तीन चार मुले आरती चा आवाज ऐकून घरात आली आणि ती सुद्धा आरती म्हणू लागली माझ्या आनंदाला पुर आला होता. नकळत माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू निघू लागले होते. स्वराताईने सर्वाना तिने बनवलेला शिरा प्रसाद म्हणून दिला. स्वराताईने याआधी कधीही इतका स्वादिष्ट शिरा बनविला नव्हता. 
मी स्वराताईला विचारलं, 
स्वराताई तू नेहमी असा शिरा का नाही बनवत???
तेव्हा स्वराताईने उत्तर दिलं की, जेव्हा आपला प्रसाद बाप्पाच्या चरणी पोचतो तेव्हा त्या प्रसादा मध्ये एक वेगळाच गोडवा निर्माण होतो.
बाबांनी सांगितलं की, पहिल्या वर्षी बाप्पा दीढ दिवस वास्तव्य करतात. आपण सुद्धा असच करूया.
बाबांनी मुर्ती आणायला जातांना गावातील पुजाऱ्यांचा सल्ला घेतला होता. त्यांनी दिलेला सल्ला संपूर्ण गावं पाळत असायचं. आम्ही रात्र भर खेळ खेळत होतो. तेव्हा झुगार नावाची गोष्ट कळत सुद्धा नव्हती. आम्ही दिवटीच्या प्रकाशात जे सोपे खेळ खेळता येईल तसे मला तर काही कळत नसायचं पण कच्चा लिंबु म्हणुन मला स्वरा ताई आणि बाबा दोघे पण घेत होते.
सकाळी उठून मी असाच बाप्पा चा फोटो न्याहाळत होतो "तेव्हा स्वराताई म्हटली,
नितु कसे आहेत बाप्पा??"
मला हुंदका येत होता, डोळ्यांतून नकळत अश्रू निघाले.
आणि स्वराताईने मला जवळ घेत, माझ्या डोक्यावर मायेचा हाथ फिरवत म्हटले, "आपण दरवर्षी या बाप्पाचे पुजन करूया आणि असेच त्यांचं प्रेमाने स्वागत करूया

©-मितेश






प्रिय शिरीन....

प्रिय, शिरीन. विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???" प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत न...