शनिवार, ४ जुलै, २०२०

स्वप्न नगरीचा राजा

स्वप्न नगरीचा राजा



"चल चल आवर पटा पट" !!!! - स्वराताई...
काय झाल? झोपू देना मला !!!! - नितीन...
अरे दादा उठ बाबा बघ काय करत आहेत .

बाबानी सगळं समान इकडे तिकडे पसारा मांडला होता. मला नक्की कळत नव्हतं काय चालू आहे. ते मी डोळे चोळत अंथुरणात बसलो, बाबांना बघत नक्की करत काय आहेत बाबा???

मी नितीन वय वर्ष ७ इयत्ता २ री (ब) जिल्हा परिषद शाळेत शिकतो. स्वराताई माझी मोठी बहीण इयत्ता ५ वी मध्ये शिकते माझ्याच शाळेत आणि विठ्ठल माझे बाबा महार गावात कुठं जनावर मृत पावल किंवा कुठ गटार तुंबली की गावकरी बाबांना प्राधान्य द्यायचे
" फाटक पिवळे धोतर आणि मळकटुन मातीच्या रंगाचा सदरा, पायात चप्पल नावाची गोष्ट कधी मिळाली नाही, टाचांना भल्या मोठ्या मोठ्या चिरा पडलेल्या आणि सतत कुणाकडे तरी काहीतरी काम मिळेल अशी आशा ठेवणारे माझे बाबा".
 अस आमचे तिघा जणांचे कुटुंब आई काळाच्या ओघात केव्हा निघून गेली काही कल्पना नाही कधी गेली कशी गेली कुठे गेली पण बाबा दररोज सांगतात 
"आभाळात ती चांदणी दिसते का? जी खुप जास्त लखलखते तीच तुझी आई कायम तुला बघत असते-(बाबा बोलत होते)”
बाबा!!! 
आई रात्र झाली का दिसते?
 दिवस भर मला बघायला सुद्धा येत नाही मी एकटाच असतो दिवस भर माझ्यासोबत कुणी बोलत सुद्धा नाही स्वराताई पण तिच्या मैत्रिणींच्या सोबत खेळत असते मला खेळायला कुणी घेत सुद्धा नाही.

काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे, आणि या वर्षी मी बाबांना सांगणार आहे, आपल्या घरी बाप्पा घेऊन या म्हणून पण बाप्पा ला आणले की, 
बसवायचे कुठे मी एकटाच विचार करत होतो!!.
"नारळाच्या झावळ्यानी बनवलेलं जेमतेम १० X १० च माझं घर असावं आणि त्यात शेणाने सारवलेल".
 घरात एकही टेबल नाही घरात देव्हारा नाही एक छायाचित्र खराब झालेला फोटो होता, त्यात कोणते देव होते हेही कळत नव्हते पाण्याने त्यातील चित्र पुसट झाले होते मी बाबांना नेहमी म्हणायचो बाबा हे कोणते देव बाप्पा आहेत. तेव्हा बाबा उत्तर द्यायचे हे "गणपती बाप्पा" आहेत.
आता गणपती बाप्पा कोण हे कुणाला माहीत नसावेत लहानपणापासून प्रत्येकाला माहीत असत गणपती बाप्पा कोण आहेत. जेव्हा पण गणपती येतात तेव्हा असा काही जल्लोष प्रत्येक घरा घरा मध्ये असतो की सगळी कडे एक मन प्रसन्न करणार वातावरण निर्माण झालेलं असत. 
सगळीकडे सुगंधी अगरबत्तीचा सुगंध आणि गाण्यांच्या जल्लोषात सर्व गणेश जयंती साजरी करत असतात आणि या वर्षी मी सुद्धा बाबांना आग्रह करणार आणि गणपती बाप्पाला घरी घेऊन येणार 

मी-बाबा आपल्या घरी गणपती बाप्पा घेऊन या ना??????
मला बाप्पा बरोबर खेळायचं आहे!!!!
माया अक्का बोलते, बाप्पा ला घेऊन आला की बाप्पा ला सांग तू तुझ्या आईला बोलवून आणेल.

"स्वरा" माझी ताई आणि आई दोन्ही सकाळी उठल्यापासून मला कडपे घालून नाष्टा चारून डब्बा बनवून देऊन माझ्या शाळेत सोडे पर्यंत स्वराताई नुसती माझी "आई" झालेली असते. ताईने कधी मला आईची कमतरता भासू दिली नाही, पण शेजारील मुलांच्या आई बघून मला आई पाहिजे असायची. पण ताई मला तिच्या पोटच्या मुला सारखी सांभाळत होती ताईने कधीच मला रडवल नाही. पण जेव्हा केव्हा मी राडायचो तेव्हा ताई मला खुदकन हसवायची जस की तिला माझ्या प्रत्येक गोष्टीच गुपित ठाऊक होतं. 
बाबांना माहीत होतं आपला मुलगा हट्टी आहे.
बाबा घेऊन या ना बाप्पा ला…
स्वराताई बाबांना सांग ना मला बाप्पा पाहिजे!!! 
 म्हणून त्यांनी होकारार्थी मान डोलावली पण बाबांना माहीत होतं आपली परिस्थिती खुप बिकट त्यात गणपती येणार म्हटल्यावर खर्च आला खिशात जेमतेम ५ रुपये आणि पावसाने लावलेली छतावरून गळती अश्या गळती मध्ये बाप्पा कसे घेवून येणार, पण कदाचित बाबांची सुद्धा इच्छा होती की बाप्पा घेऊन यायचेच यावेळी.
 सकाळी सकाळी सरपंचाच्या माणसाने निरोप आणला "विठ्ठल!! चल सरपंचांनी बोलावलंय
सरपंचांनी २ रुपयांच्या बोलीवर बाबांना एक एकर शेतीत लावणी करिता बोलवलं पैसे कमी होते पण बाबांना सध्या पैसे पाहीजे होते दोन्ही मुलांच्या अपेक्षा २ रुपयांच्या साठी एक एकर शेती लावत होते आणि आम्ही दोघे आनंदाने भरून आलो होतो.
स्वराताई समजूतदार आणि हुशार होती तिला बाबांचं दुःख त्रास वेदना कळून येत होत्या दररोज बाबा एक वेळ जेवून आम्हाला दोन वेळ पुरेल अस वागत होते स्वरा ताई सतत माझी समजूत काढत असायची पण मी बालिश वृत्ती चा असल्यामुळे मला फारसे काही कळत नसायचे. 

लवकरच गणेश चतुर्थी जवळ येत होती. बाबानी संपूर्ण घरात शेण सावरले होते स्वरा ताईने बाबांना खुप मदत केली होती. पण अजूनही काही तयारी झाली नव्हती. बाबांना त्यांच्या समाजातील काही लोक आवडे लावत होते की महार गणपतीची पुजा करत नाहीत. पण बाबांनी सुद्धा हट्ट धरला होता यावेळी कितीही अडचणी आल्या तरी गणरायाचे आगमन करायचेच. 
शेवटी तो दिवस आलाच. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि मी  आणि स्वराताई घरीच होतो. बाबांनी स्वराताईला सांगितले की, मी गणरायाची मुर्ती आणायला जातोय आणि बाबा निघून गेले.

स्वराताईने प्रसादाची उत्तम सोय केली. शिरा बनवला होता आणि मी आतुर झालो होतो की बाबा कधी येतील. मी सतत स्वराताईला विचारत होतो, ताई बाबा कधी येतील???
स्वराताई सतत मला सांगत होती, नितु बाळा येतील बाबा लवकरच येतील.
मी आज नवीन शर्ट घातला होता. बाबांनी मागच्या वर्षी दिवाळीला घेतला होता आणि शाळेची चड्डी आणि पावडर लावून तयार होतो. पण बाबा काही येईना. सकाळची दुपार झाली. शिरा पुर्ण थंड झाला होता. मला भूक सुद्धा लागली होती पण स्वराताईने सांगितले होते की, जोवर बाप्पा येऊन जेवत नाही तोवर आपण उपास करायचा असतो. सात वर्षाच्या मुलाला उपास वैगेरे काय माहीत असणार???
इतक्यात
बाबा आले !!!
 बाबा आले !!! 
मी इतका खुश झालो की माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण बाबांच्या हातात मुर्ती काही दिसेना. बाबांच्या हातात एक चौकीनी वस्तू वर्तमानपत्रात गुंडाळून घेऊन येत होते.माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव तयार झाला होता. तेवढ्यात बाबा दारात आले. स्वराताईने बाबांच्या पायावर पाणी ओतले आणि त्यांना घरात घेतले. 

मी उड्या मारत होतो स्वरा ताई म्हटली अरे थांब थांब 
बाबा मुर्ती कुठे आहे???
 बाबा सांगा ना बाबा????
"अरे राजा, मुर्ती नाही मिळाली" बाबांनी उत्तर दिले
म्हणून मी गणरायाचे छायाचित्र आणलं आहे. आपल्या देव्हाऱ्यात जे बाप्पा आहेत ते खराब झाले आहेत ना म्हणून मग मी हे घेऊन आलो.
मी पूर्णपणे नाराज झालो होतो. सर्वांच्या घरात मोठं मोठया गणरायाच्या मुर्त्या पाहून मला वाटले बाबा सुद्धा एखादी मोठी मूर्ती घेऊन येतील. पण बाबांनी मला दिलेला शब्द पाडला नाही.
बाबांनी आणि मी अगदी मूर्तीची जशी  तशी त्या छायाचित्राची प्रतिष्ठापना केली. त्या नंतर आरती सुरू झाली की तेवढ्यात शेजारील तीन चार मुले आरती चा आवाज ऐकून घरात आली आणि ती सुद्धा आरती म्हणू लागली माझ्या आनंदाला पुर आला होता. नकळत माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू निघू लागले होते. स्वराताईने सर्वाना तिने बनवलेला शिरा प्रसाद म्हणून दिला. स्वराताईने याआधी कधीही इतका स्वादिष्ट शिरा बनविला नव्हता. 
मी स्वराताईला विचारलं, 
स्वराताई तू नेहमी असा शिरा का नाही बनवत???
तेव्हा स्वराताईने उत्तर दिलं की, जेव्हा आपला प्रसाद बाप्पाच्या चरणी पोचतो तेव्हा त्या प्रसादा मध्ये एक वेगळाच गोडवा निर्माण होतो.
बाबांनी सांगितलं की, पहिल्या वर्षी बाप्पा दीढ दिवस वास्तव्य करतात. आपण सुद्धा असच करूया.
बाबांनी मुर्ती आणायला जातांना गावातील पुजाऱ्यांचा सल्ला घेतला होता. त्यांनी दिलेला सल्ला संपूर्ण गावं पाळत असायचं. आम्ही रात्र भर खेळ खेळत होतो. तेव्हा झुगार नावाची गोष्ट कळत सुद्धा नव्हती. आम्ही दिवटीच्या प्रकाशात जे सोपे खेळ खेळता येईल तसे मला तर काही कळत नसायचं पण कच्चा लिंबु म्हणुन मला स्वरा ताई आणि बाबा दोघे पण घेत होते.
सकाळी उठून मी असाच बाप्पा चा फोटो न्याहाळत होतो "तेव्हा स्वराताई म्हटली,
नितु कसे आहेत बाप्पा??"
मला हुंदका येत होता, डोळ्यांतून नकळत अश्रू निघाले.
आणि स्वराताईने मला जवळ घेत, माझ्या डोक्यावर मायेचा हाथ फिरवत म्हटले, "आपण दरवर्षी या बाप्पाचे पुजन करूया आणि असेच त्यांचं प्रेमाने स्वागत करूया

©-मितेश






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रिय शिरीन....

प्रिय, शिरीन. विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???" प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत न...